HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत !, संजय राऊतांचा ‘रोखठोक’ इशारा 

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा काहीच दिवसांपूर्वी धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाला. या प्रकरणी, NIAकडून आता सचिन वाझे यांनी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे, सध्या राज्याचे राजकीय वातावरण पेटले आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप, दावे-खुलासे समोर येत असून महाविकासआघाडीची पुरती कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसुख हिरेन यांच्या संशयित मृत्यूच्या रहस्यपटात अंबानींच्या ढालीआडून नेमके काय सुरू आहे?, असा सवाल आज (१४ मार्च) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’ या सदरातून करण्यात आला आहे.

ठाकरे सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत !

संजय राऊत आपल्या रोखठोक या सदरात म्हणतात कि, “अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू लगेच होतो, विधानसभेत त्यावर चार दिवस गदारोळ होतो हे सर्व रहस्यमय प्रकरण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहे. या सर्व प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे सगळ्यात आधी पोहोचत राहिली. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत”, असे म्हणत संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना पुढे संजय राऊत असे म्हणतात कि, “मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळ्यात मोठे यश.”

महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही !

विरोधी पक्षाला घेरतात पुढे संजय राऊत म्हणतात कि, “महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. खून, आत्महत्या, मृत्यू, बलात्कार यावर सत्ताधारी आणि विरोधकांत रणकंदन सुरू आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. मनसुख हिरेन याचा मृत्यू हा खून असल्याचे सांगून विरोधी पक्षाने सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचा बळी मिळवला, पण अन्वय नाईक व मोहन डेलकर या दोन आत्महत्यांसंदर्भात विरोधी पक्ष काहीच मनापासून बोलायला तयार नाही. मुकेश अंबानी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव देशासाठी किती महत्त्वाचा आहे हे देशवासीयांना गेल्या पंधरा दिवसांत नव्याने समजले हे बरे झाले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वक्फ मालमत्तेची माहिती द्या – प्रधान सचिव श्याम तागडे

News Desk

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

News Desk

“किती वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांची फसवाफसवी?” – सोमय्या

News Desk