HW News Marathi
Covid-19

ज्यांचा पराभव होणार असतो ते आधीच तयारी करतात…! जयंत पाटलांनी डिवचलं

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत एकीकडे शिवसेनेनला शह देण्यासाठी भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडी विरुद्ध भाजप अशाही टीका सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “ज्यांचा पराभव होणार ते आधीच तयारी करत आहे. त्यांना आम्हीच चितपट करणार आहोत. देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना कळून चुकले आहे की त्यांचा पराभव होणार आहे”, असा बोचरा टोला जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

जयंत पाटील यापुढे म्हणाले कि, “मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्यात येईल. मात्र, अजून महापालिका निवडणुकांना वेळ आहे. आतापासूनच ज्यांनी तयारीला सुरुवात केली त्यांना महत्व देऊ नका. आता ज्यांचा पराभव होणार ते आधीच तयारी करत आहेत. मात्र, त्यांना आम्हीच चितपट करणार आहे. देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले तरीही त्यांना माहिती झाले आहे की, आपला पराभव होणार आहे”, असा जोरदार टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्वारंटाइन शिक्क्याची हातावर रिअ‍ॅक्शन, नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

सांगलीतील १२ जणांना कोरोनाची लागण,जिल्ह्यात कोरोनाचे २३ रूग्ण !

Arati More

खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करा! – अजित पवार

Aprna