HW News Marathi
महाराष्ट्र

‘जो संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना…’ रामदास आठवले

नवी दिल्ली। “केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची गरज नाही. पेगॅसिस बाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग 3 दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशीही जो खासदार आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालत संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा,” अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.

संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो

“कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी. एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे. मात्र, विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे. सलग 3 दिवसांपर्यंत गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे. यामुळे संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यातून देशाचे नुकसान होते. त्यामुळे सलग 3 दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार चौथ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्याला 2 वर्षांसाठी निलंबित करावे. सरकार पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा.”

बेस कॅम्प उभरण्याची मागणी

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभरण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिलाय. तसेच त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे प्रयत्न करू, असं आश्वासन आठवले यांनी दिलं.

निवडणुकीत खेळा नाही, तर मोदींच्या समर्थनाचा मेळा

2024 च्या लोकसभा निवडणुकीत खेळा नाही, तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे. 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येईल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही,” असे रामदास आठवले यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लम्‍पीतून ३ हजार २९१ जनावरे रोगमुक्त; पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती

Aprna

राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करू – चंद्रकांत पाटील

News Desk

११ जूनपर्यंत बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल 

News Desk