HW News Marathi
महाराष्ट्र

अर्नाळामध्ये सापडला टाईम बॉम्ब

विरार | अर्नाळा येथे टाईम बॉम्ब बनविणाऱ्या वस्तू सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. बॉम्ब बनविणारे साहित्य फेक्ट्रिपाडा येथील एका कचरा पेटीमध्ये १० जिलेटिनच्या कांड्या आणि टाइमर अशी बॉम्ब बनविणारे साहित्य पोलिसांना मिळाले आहे.

अर्नाळा ग्रामपंचायतीतर्फे गावात सकाळी ९.३०च्या सुमारास स्वच्छता सुरू असताना कचरा उचलण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हा बॉम्ब सापडला. या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब सुरक्षित जागी रेती व सिमेंटच्या रिंगणात ठेवण्यात आला असून बॉम्ब निकामी केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून दरमहा किती कमाई?; नितीन गडकरी यांनी सांगितलं!

News Desk

महाराष्ट्र सदन प्रकरण-आधी गुन्हा नोंदविण्यासाठी संमती, मग सादर झाला मूल्यांकन अहवाल 

News Desk

“व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी…”, चित्रा वाघ यांचा पलटवार

News Desk
राजकारण

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

Gauri Tilekar

मुंबई | सध्या मुंबईत २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली होती. मात्र शरद पवार यांनी “मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यातून निवडणूक लढविण्याचा काहीच प्रश्नच नाही, या शब्दात लोकसभा निवडणूक लढविण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ हे सर्व उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ‘पुणे लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी’ असा आग्रह केला जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली होती. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा केला असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

परळीत फक्त बहिणीचीच हवा, भावांनी लक्षात ठेवा !

News Desk

मोदी-शहांना मोठा धक्का, एनडीएतून आणखी एक पक्ष बाहेर पडणार ?

News Desk

विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेेंयचा पराभव

Aprna