HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत  

मुंबई | पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर १५ दिवसांनी राठोड लोकांसमोर आले आणि त्यांनी बंजारा समाजाचे पवित्र स्थान असलेल्या पोहरादेवी येथे जात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समर्थकांच्या गर्दीने मोठा गोंधळ घातला होता. कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नव्हते. यावरुन आता विरोधी पक्ष टीका करत आहेच मात्र महाविकास आघाडीमधील इतर पक्ष आणि नेतेही नाराजी व्यक्त करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय राऊत आज (२४ फेब्रुवारी) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले. पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का, याबाबत बोलण्यास राऊत यांनी नकार दिला.

पोहरादेवी गर्दीवर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, राजेश टोपेंची माहिती

News Desk

फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पहिल्या शपथीचा मान विखे-पाटलांना

News Desk

पाचशे बाळंतपण करणाऱ्या जळूबाई वाघमोडे यांचे १०५ व्या वर्षी वृद्धापकाळी निधन

News Desk