HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांबद्दल पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. शरद पवार छोटे नेते आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवारांविरोधात बोलणाऱ्यांना कुणी सीरियसली घेत नाही. त्यांची पवारांवर बोलण्याची लायकी काय आहे?, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर नाव न घेता टीका केली. आज (२७ नोव्हेंबर) वर्षपूर्ती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.

शरद पवारांना राजकारण, समाजकारण आणि प्रशासनाचा प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शन सुद्धा सरकारला आहे. तरीही भाजपचे नेते पवार हे अत्यंत कमी उंचीचे नेते असल्याचं सांगत आहेत, त्यावर तुम्हाला काय वाटतं?, असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर त्यांचं नाव न घेता टीका केली. जाऊ द्या हो, असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही… ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. मान्य… पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय असून सरकार चालवताना कोणतीही कसरत करावी लागत नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार चालवताना कसरत करतोय असं वाटत नाही. कारण काहीही असेल, पण तीनही पक्ष एकमेकांत असे मिसळून गेले आहेत. अगदी अजितदादा आहेत… बाळासाहेब थोरात आहेत, अशोकराव आहेत… कुणाकुणाची नावं घेऊ? नितीनराव आहेत, जितेंद्र आहे, वडेट्टीवार आहे, हसन मुश्रीफ आहेत, नवाबभाई आहेत… सगळ्यांचीच नावं घ्यावीशी वाटत आहेत, पण किती जणांची नावं घेऊ.

सगळे माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागताहेत… आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतील ते, अशीच त्यांची भूमिका असते. मला आश्चर्य वाटतं की, काही वेळेला मी कॅबिनेटमध्ये बघत असतो की, मला अनुभव नाही तरी मी बसलोय… आणि ही सगळी लोकं… कालपर्यंत सगळे एकमेकांच्या विरोधात होतो… पण आज ज्या आपुलकीने वागताहेत… आदराने वागताहेत… त्यांचं वर्णन करता येत नाही. फार समजुतीने सगळे जण छान वागताहेत आणि सगळं अतिशय चांगलं चाललं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शिका प्रकाशित, समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी

News Desk

हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड

News Desk

ब्राह्मण समाजानेही केली आरक्षणाची मागणी

News Desk