HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात अघोषित लोडशेडिंग !

मुंबई | राज्यात सुरु असलेल्या अघोषित लोडशेडिंगबाबत आज (११ ऑक्टोबर)ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच मलिक यांनी राज्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे आणि ऊर्जा खात्यातील चार कंपन्यांचे सल्लागार असलेले विश्वास पाठक यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी यावेळी केली.

महाराष्ट्राच्या वाटेला आलेला कोळसा निवडणुका असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याला वीज टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या तीन राज्यांचे हित बघायचे आणि महाराष्ट्राला अडचणीत आणायचा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारची अघोषित लोडशेडिंग सुरू

तसेच नवाब मलिक यांनी राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरू असल्याचे सांगतानाच राज्यात ११-१२ तास लोकांना वीज मिळत नाही आहे. सरकारला वीजेची कमतरता भासत होती तर त्यांनी जनतेला लोडशेडिंगबाबात जाहीरपणे माहिती देणे किंवा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक होते. ती जबाबदारी सरकारची होती मात्र सरकारने तसे न करत अघोषित लोडशेडिंग जाहीर केली आहे. आज राज्यात ऊर्जा विभागाने काल जी इंटरनल नोट तयार केली आहे. त्या नोटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की,२० टक्क्यांनी डिमांड वाढली होती. आणि एकंदरीत ३ हजार मेगावॅटचा तुटवडा होता. तर त्यापध्दतीची नोट जाहीर करायला हवी होती. राज्यातील जिल्हयात किती तास वीज नाही, याची घोषणा केली पाहिजे होती. त्यामुळे जनतेला स्वत:चे नियोजन करता येवू शकते. परंतु सरकार ही माहिती लपवून ठेवत आहे. त्यांना जनतेला माहिती दयायची नाही जनतेला अडचणीत आणायचे आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक!”

News Desk

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे राज्य व देशभर पडसाद; राष्ट्रवादीने केले काळ्यापट्टया बांधून मूक आंदोलन

News Desk

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेही कोरोनामुक्त

News Desk
मुंबई

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला कुलूप, मनसेचा पालिकेत धिंगाणा

News Desk

मुंबई | मुंबई महापालिकेत असलेल्या पत्रकार कक्षाला कुलूप असल्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेला परवानगी नाकारल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. पत्रकार कक्षाला कुलूप लावल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कक्षात धडक मारुन जाब विचारला.

बीएमसीमधील या पत्रकार कक्षेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे महापालिकेच्या एका आरक्षित भूखंडाबाबत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र इथे पत्रकार परिषदेला परवानगी नसल्याचं कारण देत जनसंपर्क विभागाने या कक्षाला कुलूप लावलं. तसंच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या संदीप देशपांडे यांनी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे यांच्या कक्षात धडक मारत जाब विचारला. दरम्यान, यासर्व प्रकारामागे शिवसेना असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

एवढी घाबरलेली शिवसेना पहिल्यांदा पाहीली

आजपर्यंत शिवसेनेला इतरांच्या पत्रकार परिषदा उधळताना बघितले होते, स्वत:च्या पत्रकार परिषदा गाजवताना बघितले होते, पण आज पहिल्यांदा शिवसेनेला कुणाच्यातरी पत्रकार परिषदेमुळे घाबरलेले बघितले . शिवसेना आम्हाला घाबरली कारण, त्यांच्या मनातच काळेबेरे आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीच जनसंपर्क विभागाला मनसेची पत्रकार परिषद रोखण्यास सांगितले आणि पत्रकार कक्षालाच टाळे लावले, अशा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. दादरमधील शिवाजी पार्कच्या जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला बांधण्याचा विचार सुरु आहे. इथे दहा हजार महापालिका कर्मचारी व्यायामशाळेत येतात आणि इतर मैदानी आणि बैठे खेळ खेळतात. इथे महापौर बंगला झाला तर मनसेचा विरोध राहिल. बंगल्याची एकही विट इथे रचू देणार नाही. असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. महापौर बंगल्याचा विषय आज पत्रकार परिषदेत होता, म्हणूनच शिवसेना घाबरली आणि माझी पत्रकार परिषद रोखली, असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Related posts

बीएमसी आयुक्तांना मुख्यमंत्री वाचवतायत – संजय निरूपम

News Desk

प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

News Desk

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk