HW News Marathi
महाराष्ट्र

बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत होणार | मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या नियोजित जागेची पाहाणी केली. १४ एप्रिल २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

या स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून पुढील वर्षापासून काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे मुख्यमंत्री म्हटले. तसेच इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्य स्मारक असेल. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकास स्मारकाच्या भव्य उंचीमुळे वांद्रे-वरळी सी लिंकवरु नही दर्शन घेता येईल. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे.

मुख्यमंत्री या जागेची पाहाणी करताना त्यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस.मदान, स्मारकाचे वास्तू विशारद आणि प्रभू असोसिएट्सचे शशी प्रभू आदी मंडळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…म्हणून आजचा ओबीसी आरक्षणासाठीचा हा शेवटचा मोर्चा – समीर भुजबळ

News Desk

‘आमचा अनिल देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही’, ईडी कडून महत्वाची माहिती

News Desk

भारताची वाटचाल सिरियाच्या दिशेने | प्रकाश आंबेडकर

News Desk
महाराष्ट्र

आरक्षणात बदल होणार नाही | तावडे

News Desk

मुंबई | महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसात दलित आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये असलेले मंत्री १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवाद करताना काय आश्वासन देणार याकडे सर्व दलित जनतेचे लक्ष लागले असताना आरक्षणात कोणताही बदल होणार नाहीत असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी चैत्यभूमी येथे बोलताना दिले.

यावेळी बोलताना तावडे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या राज्यघटनेमुळे गिरणगावातली मी मंत्री होतो चाय विकणारे सामान्य नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतात हे सर्व बाबासाहेबांमुळे शक्य झाले. त्यामुळे बाबासाहेबांनी दलितांना मिळवून दिलेल्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. राज्य सरकारने डॉ आंबेडकरांचे लंडन मधील घर विकत घेतले आहे. डॉक्टर आंबेडकरांशी निगडीत असलेल्या पाच स्थळांना राज्यसरकाराने पंचतीर्थ म्हणून घोषित केल्याचेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री दरवर्षी नागपूर स्थित दिक्षाभूमीला जाऊन अभिवादन करतात त्यामुळे ते आज या ठिकाणी येऊ शकले नाहीत असेही यावेळी बोलताना तावडेंनी आवर्जून सांगितले.

Related posts

“हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे”- रविकांत तुपकर

News Desk

आगामी निवडणुकीत वंचित- MIM आघाडी होणार? असदुद्दीन ओवेसींचे संकेत

News Desk

चित्रपटातील पोलीस आणि खऱ्या पोलिसांमध्ये फरक असतो, जमिनीवर राहा, नव्या PSI ना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

News Desk