HW News Marathi
महाराष्ट्र

बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत होणार | मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या नियोजित जागेची पाहाणी केली. १४ एप्रिल २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

या स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून पुढील वर्षापासून काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे मुख्यमंत्री म्हटले. तसेच इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्य स्मारक असेल. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकास स्मारकाच्या भव्य उंचीमुळे वांद्रे-वरळी सी लिंकवरु नही दर्शन घेता येईल. ऑक्टोबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे.

मुख्यमंत्री या जागेची पाहाणी करताना त्यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस.मदान, स्मारकाचे वास्तू विशारद आणि प्रभू असोसिएट्सचे शशी प्रभू आदी मंडळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”, दरेकरांचं टीकास्त्र

News Desk

Kulbhushan Jadhav Verdict । १ रुपया वेतनात हरीश साळवे यांनी लढविला खटला

News Desk

महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही

Sanjay Jog
महाराष्ट्र

अंघोळीची गोळी संस्थेला ‘दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Gauri Tilekar

पुणे | दिव्या फाऊंडेशन, बुलढाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाजभान जपणाऱ्या तरुणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असतो. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन या विषयावर सातत्याने काम करत आहे. याच कामांची दखल घेत दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने देण्यात येणारा दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन करणाऱ्या या तरूणाईचा होणार गौरव होणार आहे.

झाडांना देखील संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी मोहीम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरु केली होती. अगदी अल्पावधीतच ही मोहीम व्यापक पद्धतीने महाराष्ट्रभर पसरली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडे ही मोहीम आज सुरु आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरु केलेली अंघोळीची गोळी ही संस्था सध्या प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करून पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे.

“पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मुंबईच्याअंघोळीची गोळी टीम म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणुन साजरा व्हावा यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Related posts

१०० % उपस्थितीती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

News Desk

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी! – उद्धव ठाकरे

Aprna

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी कालवश

News Desk