HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंपदा मंत्री जयंत पाटील चाळीसगांव भागात नुकसानीची करणार पाहणी!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून उद्या चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत. मागील दोन दिवसापूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी

अनेक ठिकाणी दरड कोसळली होती तर बर्‍याच गावांमध्ये पूराचे पाणी घुसुन घरांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मंत्री जयंतराव पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधणार

आपल्या दौऱ्यादरम्यान मंत्री जयंतराव पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर मंत्री जयंतराव पाटील औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट….

swarit

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून 5 लाख रुपये मिळणार

Aprna

…तर अधिकाऱ्यांना शॉक देणार, मनसेचा इशारा!

News Desk