HW News Marathi
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्राचा नेता हरपला

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. पतंगराव कदम यांच्या रुपाने राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याजवळ अंत्यविधी केले जातील.

पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्याने पतंगरावांनी पायी जाऊन प्राथमिक शिक्षण घेतलं. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. 1964 साली वयाच्या20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही, असे शरद पवार म्हणाले.

पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कामासाठी पतंगराव कायम स्मरणात राहतील, त्यांच्या जाण्याने या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रोहित पवारांनी घेतली प्रविण दरेकरांची भेट, राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण

News Desk

“…म्हणून दादागिरी खपवून घेणार नाही”, प्रवीण दरेकरांचा इशारा!

News Desk

कोण होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष? कोणाच्या  नावाची लागणार वर्णी

News Desk
महाराष्ट्र

मंत्री पकंजा मुंडेंच्या गावात जलयुक्तमध्ये घोटाळा

News Desk

बीड | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी चोवीस अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परळी पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता.2015-16 या आर्थिक वर्षात जलयुक्‍त शिवार या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी 24कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला.

परळी तालुक्यातील 307 कामांमध्ये कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन बोगस कामं केली. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर 18 कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं होतं. आता एकूण 24कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. एकूण दोन कोटी 47 हजार 672रुपयांचा हा अपहार असल्याचं उघड झालं.

या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी लावून धरली होती. कृषी आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार परळी तालुक्याचे कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अपहार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

Related posts

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची मदत

Aprna

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात

swarit

हे पहिले सरकार आहे जे सांगते की, आमचे राज्यपालांसोबत खुले युद्ध आहे – सुधीर मुनगंटीवार

News Desk