HW News Marathi
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्राचा नेता हरपला

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. पतंगराव कदम यांच्या रुपाने राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याजवळ अंत्यविधी केले जातील.

पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्याने पतंगरावांनी पायी जाऊन प्राथमिक शिक्षण घेतलं. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. 1964 साली वयाच्या20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही, असे शरद पवार म्हणाले.

पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कामासाठी पतंगराव कायम स्मरणात राहतील, त्यांच्या जाण्याने या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार कसून तयारी

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगली दौऱ्यात गोंधळ’,भाजपा कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा!

News Desk

इतिहासकार पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचे निधन

News Desk