HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय”, पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य

अहमदनगर। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये मुंबई क्रुझ ड्रॅग प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. आणि या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू होत्या, मात्र यात आघाडीवर असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विरुद्ध विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या मालिका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या सर्व प्रकारावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केल आहे. पंकजा मुंडे या नगर जिल्ह्यामधील पाथर्डीमध्ये विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे आणि खासदार सुजय विखे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला

पुढे बोलताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली ते माहित नाही, मात्र राजकारणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. सत्तेत बसलेले पक्ष आमच्यावर आरोप करत आहेत. या सर्व गोंधळामध्ये राज्याचा विकास मागे पडला असून, नको ते विषय समोर येत आहेत. विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जर विकासावर भर दिला तर अधिक चांगले होईल, मात्र आता अलीकडच्या काळात राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते असे देखील मिश्किलपणे पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केले. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी प्रतिपादन केले आहे.

आपल्या पक्षातील नेत्यांना टोला

मात्र यावेळी पंकजा मुंडे यांनी फक्त विरोधकांवरच टीका न करता त्यांनी स्वतःच्या पक्षालाच देखील घरचा आहेर देत टोला लगावला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी जे जोडे घातले आहेत, त्यांनी त्याच जोड्याला शोभेल असे वागावे. आम्ही विरोधी पक्षाच्या जोड्यामध्ये आहोत. तर आम्ही विरोधी पक्षासारख खंबीर वागले पाहिजे. त्याचबरोबर आमची सत्ता होती, तेव्हा आम्ही काय केले आणि काय केले नाही हे ठासून सांगितले पाहिजे. सरकार पडण्याची विरोधकांनी वाट पाहू नये, तर असे कार्य करावे की ज्या कार्याची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल असा सल्लाही त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिला आहे. म्हणून आता पंकजा मुंडे यांनी घरच्याच नेत्यांना सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जन्मदात्याचाच अल्पवयीनेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

News Desk

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 10 एप्रिल रोजी नांदेडमध्ये 

News Desk

भारत स्वतंत्र विचारांचा देश | प्रणव मुखर्जी

News Desk