HW News Marathi
महाराष्ट्र

“मास्क का वापरू नये? याचे उत्तर राज ठाकरेंनी द्यावे” – संजय राऊत  

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तरीही मास्क लावत नव्हतेच. आणि आज (५ मार्च) राज ठाकरे नाशिमध्ये गेले असताना त्यांनी नाशिकच्या महापौरांना मास्क काढण्यास सांगितला होता. त्यामुळे राज ठाकरे मास्क घालत नाही याची चर्चा सध्या राजकीय वर्तृळात जोरदार सुरु आहे. यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचं एकदा ठोस कारण सांगावं, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलं आहे.

सर सलामत तो पगडी पचास

देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहेत. त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सर सलामत तो पगडी पचास तसं आधी जीव महत्वाचा आहे. इस्पितळात गेल्यावर जे भोगावे लागते ना…तेव्हा वाटते अरेरे ऐकायला हवे होते…मास्क घालायला हवे होते. मग आधीच ऐका ना, असा सल्ला राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

राज ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं, मास्क का वापरायचा नाही?

राज ठाकरेंबद्दल काय बोलणार… ते मनसेचे पक्षाचे नेते आहेत पण मास्क का वापरत नाहीत याचं त्यांनी ठोस विश्लेषण करणे गरजेचे आहे. वैद्यकीय कारण काय आहे?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ते सुद्धा कलाकार आहेत, जाणकार आहेत. लोकांचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, मास्क का वापरू नये? मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणतात मास्क वापरा… तसं राज ठाकरेंनी पटवून दिले पाहिजे मास्क का वापरू नये. पण शेवटी मास्क न वापरणे लोकांसाठी धोका आहे. काल अजित पवार यांनीही सांगितले. ते स्वतः या संकटातून गेले आहेत. मास्क वापरणे किती गरजेचे आहे हे ज्यांना करोना झाला आहे किंवा होऊन गेला आहे त्यांना ठाऊक आहे.

मास्क हीच खरी लस

मुख्यमंत्र्याचा आरोग्य या विषयावर चांगला अभ्यास आहे. या विषयांवर त्यांना बरचंस कळतं. जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. देशाचे पंतप्रधान, विविध मंत्री, मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहे. मास्क हीच खरी लस आहे आणि त्यात तथ्य देखील आहे, असंही राऊत म्हणाले.

जेव्हा माझा मास्क खाली येतो तेव्हा…

कधी कधी आमच्याडूनही ढिलाई होते, पण तसं चालत नाही. रस्त्यावर फिरताना, सार्वजनिक ठिकाणी, नियमांचे पालन करायला हवे. मी बहुतांश वेळा नियमांचं पालन करतो. पण जेव्हा मास्क खाली येतो तेव्हा मला मुख्यमंत्र्यांची आठवण येते. कारण त्यांनी असं पाहिलं तर ते ताबडतोब चंपी करतात. प्रेमाने म्हणा किंवा काळजीपोटी.. पण मास्क घालण्याचा ते नेहमी आग्रह धरतात, असं राऊत म्हणाले.

जेव्हा संजय राऊतांना दंड होतो…

मास्क घातला नाही तर बऱ्याच ठिकाणी कारवाई होते. दिल्लीत मी स्वतः कारवाईला समोरा गेलो आहे. दंड भरला आहे. माझ्यासह अनेक खासदारांनीही दंड भरला आहे. एकदा गाडीतून विमानतळावर जात असताना फोनवर बोलण्यासाठी मास्क थोडा खाली केला होता. पण पोलीस पथकाने ते बरोबर हेरलं. माझी गाडी बाजूला घेतली. माझे PA त्यांना म्हणाले, MP साहेब आहेत. त्यावर पोलिसांचे उत्तर बाणेदार होते, ते मला खूप आवडले. MPअसले म्हणून काय झाले? मास्क वापरणे आवश्यक आहे आणि MP साहेब कायदा तयार करणारी मंडळी आहेत. आम्ही कायद्यानुसार कारवाई करतो. मी ताबडतोब दंड भरला कारण मी नियम मोडला होता, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून तोडगा काढणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

आता धारावीतील प्रत्येक नागरिकाची होणार कोरोना टेस्ट

News Desk

अमित शाहांच्या ‘देखते है’चा अर्थ मुख्यमंत्र्यांनी ‘हो’ घेतला –  चंद्रकांत पाटील

News Desk