HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या वक्तव्याचा मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसणार? फडणविसांचं उत्तर!

मुंबई। नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील वक्तव्यामुळे भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळली आहे. नुकसान झालं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचंच होणार आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्याचा फटका बसेल

फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि भाजपमधील राड्यावर भाष्य केलं. राणेंच्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला नुकसान होईल का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर फडणवीसांनी थेट उत्तर दिलं. महाराष्ट्रात शर्जिल उस्मानी येऊन हिंदुत्वाला शिव्या देतो. त्याला महाविकास आघाडीचं सरकार संरक्षण देतं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत झालं तर त्यांचंच नुकसान होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्याचा फटका बसेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

आमची यात्रा थांबणार नाही

राणे साहेबांना बेकायदेशीरपणे अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही. ही जी कारवाई आहे ती अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही

राज्यात पोलिसांचा गैरवापर सुरु आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, त्यांच्यासोबत पाच वर्ष मी काम केलं आहे. संपूर्ण देशात नि:पक्ष पोलीस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे, सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस कारवाई करायला लागले तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांडं झाली आहेत, त्यामुळे प्रामाणिक पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला धक्का, जळगावात ११ नगरसेवक शिवसेनेत!

News Desk

कळव्यात पूर्णपणे ‘बंद’, मेडिकल वगळता कोणतेही दुकान सुरु राहणार नाही

News Desk

सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारणार! – किरेन रिजिजू

Manasi Devkar