HW News Marathi
Covid-19

कंटाळा आला म्हणून आपल्याला लॉकडाऊन उठवता येणार नाही !

मुंबई | “राज्यातील लॉकडाऊन हा कंटाळा घालवण्यासाठी करण्यात आला नव्हता. त्यामुळे, कोणाला तरी कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन उठवताही येणार नाही. काहीजण लॉकडाऊनला कंटाळले आहेत आणि लॉकडाऊन उठवण्यासाठी आग्रही आहेत म्हणून मी लॉकडाऊन उठवला आणि लोक मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? दारे उघडा म्हणून टाहो फोडणारे ह्याची जबाबदारी घेणार का ?”, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. शिवसेना नेते ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या अनलॉक मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

“घाईघाईने लॉकडाऊन उठवण्यात काहीही अर्थ नाही. याबाबत जे काही करायचे, ते सावध पावले टाकून करणे आवश्यक आहे. ‘कोरोना’ हे एक जागतिक संकट आहे. केवळ आपल्यावरच हे संकट नाही. संपूर्ण जग या लढाईत एकत्र आहे. जगभरात अजूनही कोरोनावर नेमकेपणाने बोलणारे किंवा सल्ला देणारे नाहीत. मात्र, असे असताना दुसरीकडे लॉकडाऊनला विरोध करणारे शहाणे आहेत. मी लॉकडाऊन उघडेन पण दुर्दैवाने लोक मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी ही मागणी करणारे घेणार का ? दाराबाहेर बसून दारे उघडा म्हणून टाहो फोडणारे ह्याची जबाबदारी घेणार का ?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

“मी लॉकडाऊन पूर्णपणे उठावतोय असे कधीही म्हणणार नाही. पण मी टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी सुरु करत चाललो आहे. मात्र, माझा प्रयत्न असा आहे की एकदा जी गोष्ट सुरु करू ती पुन्हा बंद होता कामा नये. त्यामुळे आपण केवळ आरोग्याचा किंवा केवळ अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही. दोन्ही मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत. आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्ही मुद्द्यांचा संपूर्ण तारतम्य ठेऊन विचार केला पाहिजे. खरंतर, ही तारेवरची कसरत आहे”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळ होम क्वारंटाईन, कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना 

News Desk

भारताने अमेरिकेप्रमाणे मास्क काढण्याची गडबड करू नये – AIIMS

News Desk

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

News Desk