HW News Marathi
मुंबई

वाकोल्यातून १०० किलो फेंटानिल ड्रग्ज जप्त

मुंबई | वाकोला परिसरातून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. वाकोल्यामध्ये एका ठिकाणी उभ्या असलेल्या कारमधून १०० किलो फेंटानिल ड्रग्ज सापडले आहे. या १०० किलो फेंटानिल ड्रग्जची किंमत अंदाजे कोटींच्या घरात आहे. या प्रकरणात वाकोला पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई असल्याचे म्हटले जाते.

या प्रकरणी पोलिसांनी सलीम इस्माईल धाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि धनशाम रामराज सरोज या अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. सलीम कॉटन ग्रीन परिसरात ड्रायव्हरचे काम करतो. याआधीही गांजा बाळगल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी २०१३मध्ये अटक केली होती.

संदीप तिवारी हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. चंद्रमणी यांचे कांदिवलीतील ठाकूर विलेज परिसरात मोबाईलचे दुकान आहे. सर्व आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

10 वर्षाच्या मुलावर अत्याचार

News Desk

रिक्षात झोपलेल्या सख्या बहिणीवर बलात्कार

News Desk

टोईंग केल्यानंतर ‘ती’ कारमध्ये बसली मग विडीओ शुट करून सोशल मीडियावर टाकले,VIDEO

News Desk
राजकारण

कोणताही पक्ष १०० टक्के सर्वोत्तम नाही | भागवत

News Desk

नागपूरदसऱ्याच्या निमित्ताने नागपुरमध्ये आरएसएस कडून शस्त्र पूजा तसेच संचलन करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अनेक विषयांना भागवतांनी हात घातल्याचे पहायला मिळाले. राम मंदिरसाठी कायदा करा असा हि प्रस्ताव त्यांनी मांडला. भागवत म्हणाले की,देशातील कोणताही पक्ष १००टक्के सर्वोत्तम नाही. परंतु जो बरा आहे त्यांना निवडा , राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाचा विचार करा. असे बोलताना भागवत यांचा कल भाजपाकडे होता.

जनतेने १०० टक्के मतदान करायला पाहिजे. देशाचे नेतृत्व कोणी करावे प्रत्येकाने ठेवावे. ‘नोटा ‘चा उपयोग करू नये. त्यामुळे अपात्र उमेदवाराला त्याचा फायदा होतो, असे ही भागवत म्हणाले . पक्षीय आणि जाती- पातीच्या राजकारणापासून स्वयंम संघ नेहमीच लांब आहे. उमेदवाराची राष्ट्रीय प्रेम, राष्ट्र भक्ती, राष्ट्रीय एकात्मता पाहूनच उमेदवाराला मतदान करा ,भागवत यांनी सांगितले. सोशल मीडियावर प्रक्षोभकपणे पोस्ट टाकून देशविरोधी अभियान चालविण्याचे काम शहरी नक्षलवादी करत आहेत. राजकीय आंदोलनामध्ये असेच चेहरे आता घुसत आहेत,’भारत तेरे तुकडे होंगे’असे म्हणणारे अनेक जण यात येत आहेत,पूर्वी फक्त माओवादच शहरी होता,असे भागवत म्हणाले.

Related posts

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ‘या’ तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच

Aprna

एक लाखाचे ‘ठिगळ’ कसे पुरणार?, वाढत्या बेरोजगारीवर ठाकरेंचा सरकारला सवाल

News Desk

#PulwamaAttack : देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करा !

News Desk