HW News Marathi
मुंबई

मुंबईमध्ये आगीचे तांडव

मुंबई | गेल्या काही दिवसांपासूनचे मुंबईत आग लागण्याचे सत्र चालूच असून, गुरुवारी(२७ डिसेंबर) चेंबूर टिळकनगरच्या सरगम सोसायटी या १५ मजली इमारतीला आग लागली. दहाव्या आणि अकराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात जोशी कुटुंबातील तीन, आणि गंगर कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. बचावकार्यादरम्यान इजा झाल्याने अग्निशमन दलातील दोन जवानांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सरगम सोसायटीच्या दहाव्या मजल्यावर रात्री आठच्या सुमारास आग लागली. ही आग काही वेळातच अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या दोन्ही मजल्यांवर अडकलेल्या नऊ रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र या आगीत सुनीता जोशी (७२), भालचंद्र जोशी (७२), सुमन श्रीनिवास जोशी (८३), सरला गंगर (५२), लक्ष्मीबेन गंगर (८३) या पाच जणांचा मृत्यू झाला. तर छगन सिंग (२८) या अग्निशमन कर्मचाऱ्यासह श्रीनिवास जोशी (८६) यांना धुराचा त्रास झाल्यामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील सिलिंडर आणि एसीच्या स्फोटामुळे ही आग अधिकच भडकली, असे ही घटना पाहणाऱ्यांचे सांगणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ ४ पूल दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला

swarit

मुलगी वाचवा मुलगी शिकवा संदेश देणारी मोटार सायकल रॅली

News Desk

…आता पुढील स्थानक प्रभादेवी

News Desk