HW News Marathi
मुंबई

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी

मुंबई | ध्वनीप्रदूषणाविषयी विशेषत: शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी घालण्याच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. मुंबईत शांतता क्षेत्र वर्गीकृत करण्यात आली आहेत. या शांतता क्षेत्रामध्ये रूग्णालये, शैक्षणिक संस्था, धर्मस्थळ तसेच न्यायालये यांचा समावेश आहे.

शांतता क्षेत्रे ही २४ तास म्हणजेच दिवस – रात्रीसाठी शांतता क्षेत्र घोषित केले असल्याने या क्षेत्रामध्ये ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर), संगीत वाद्य, फटाके इत्यादी वाजविण्यास संपूर्णपणे बंदी आहे. शांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी आवश्यक परवाना घेवून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, संगीत वाद्य यांचा वापर आवाजाची ठरविण्यात आलेल्या पातळीच्या उल्लंघनाशिवाय करता येणार आहे.

कायद्यानुसार आवाजाची मर्यादा औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल व रात्री ७० डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात ५० डेसिबल व रात्री ४० डेसिबल अशी ठरविण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी मुख्य नियंत्रण कक्षातील १०० क्रमांक तसेच ७७३८१४४१४४ / ७७३८१३३१३३ या क्रमांकावर एसएमएस व्दारे तक्रार करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

swarit

देशात लोकशाही धोक्यात – जावेद अख्तर

News Desk

लेट लथिफ मुंबई विद्यापीठ -210 परिक्षांच्या निकालासाठी 45 दिवस

News Desk
राजकारण

चंद्रकांत पाटलांची पलटी, म्हणाले राजकीय संन्यास नाही

News Desk

कोल्हापूर | ‘यापुढे कोणतीसही लोकसभा, विधानभा किंवा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार नाही,’ असे वक्तव्य करुन रीकामे झालेल्या चंद्रकांत दादांनी अवघ्या २४ तासात आपल्या वक्तव्यावरुन माघार घेतली आहे.

मी राजकीय संन्यास घेणार नाही. राजकीय संन्यास घेणे हे आमच्या हातात नसते. भाजपमध्ये वेगळी शिस्त आहे. पक्ष सांगेल तेच करावे लागते. आम्ही निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असते. त्यामुळे निवडणूक न लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, डॉल्बीला विरोध करण्याच्या मुद्द्यावर मला काही निवडणूक लढवायची नाही, असे मी भाषणात बोललो होतो. त्याचा वेगळा अर्थ काढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा; ‘या’ मुद्द्यांवर झाली बैठक

Aprna

लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच राज ठाकरेंनी घेतली पवारांची भेट

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

News Desk