HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मुंबई | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतुकी विस्कळीत झाली आहे. यामुळे ऑफिससाठी निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीएसटीकडे जाणारी जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गावरील वाहतुक जवळपास २० मिनिटे उशिराने सुरू आहे. कांजूरमार्ग जवळ एक लोकल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या ६ लोक गाड्यांवर परिणाम झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातील पत्री पुलाच्या पाडकामामुळे रविवारी (१९ नोव्हेंबर)ला कल्याण-डोंबिवली दरम्यान ६ तासाचा जम्बोब्लॉक घेण्यात आला होता. या पुलाच्या पाडकामामुळे लोकलसह मेल-एक्सप्रेस ठप्प असल्याने स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. मध्य रेल्वेकडून नियोजित वेळेआधी लोकल सेवा सुरू केल्याचा दावा होत असला तरी प्रत्यक्षात सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकलची प्रतीक्षा कायम होती. डोंबिवलीहून येणा-या लोकल गर्दीने भरून येत असल्याने मुलुंड, नाहूर, घाटकोपरसह कुर्ला, सायन आणि दादर स्थानकातील प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फळ-भाज्या गटारात ठेवणाऱ्या फेरीवल्यांवर कारवाई

News Desk

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमास एन वॉर्ड मधून आजपासून सुरुवात

Aprna

एटीएसने कांदिवलीतून ८ बांगलादेशीना अटक

News Desk