HW News Marathi
मुंबई

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. दोन्ही पक्ष्याच्या नेत्याची आज मुंबईत बैठक झाली. गेल्या काही दिवसापासून दोन्ही कॉंग्रेस एकत्र येतील, असे संकेत मिळत होते. त्याला आज अधिकृत दुजोरा मिळाला.

या आघाडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या काही दिवसापासून विरोध एकत्र आवाज उठवत आहेत. नागपूर अधिवेशनात देखील दोन्ही पक्ष एकत्र आले होते. आगामी निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्याने भाजप शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat
राजकारण

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

Gauri Tilekar

मुंबई | सध्या मुंबईत २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली होती. मात्र शरद पवार यांनी “मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यातून निवडणूक लढविण्याचा काहीच प्रश्नच नाही, या शब्दात लोकसभा निवडणूक लढविण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक मुंबईत घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ हे सर्व उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ‘पुणे लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी’ असा आग्रह केला जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली होती. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा केला असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

भुजबळांसाठी खुशखबर, आता राज्याबाहेर करू शकणार भ्रमंती

News Desk

लोकपाल नियुक्तीसाठी आजपासून अण्णा हजारेंचे बेमुदत उपोषण

News Desk

जर मोदी जन्मतः ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?

News Desk