HW News Marathi
मुंबई

‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्र्यांना केले होते सावध

मुंबई | अंधेरी रेल्वे स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या घटनेत एकूण ५ जण जखमी झाले आहेत. पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत दमणच्या नागरिकाने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सावध केले होते.

अंधेरीच्या फलाट क्रमांक ८ आणि ९ वरील पादचारी पुलाची अवस्था बिकट असून या मोडकळीस आलेल्या पुलाबाबत कारवाई करावी असा संदेश देणारे ट्विट विशाल तांडेल या दमण नागरिकांनी केले होते. तांडेल यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर ट्विट करुन रेल्वे मंत्र्यांना सावध केले होते. ‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि भारत सरकार यांना ५ सप्टेंबर २०१७ रोजी ट्विटरवर पाठवला होता. त्याबरोबर पुलाची वाईट स्थिती दर्शविणारे फोटोही पाठवले होते. परंतु त्याची दखल घेतली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नगरसेवकांवर आता लवकरच सीसीटीव्हीची नजर

News Desk

ठाणे महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात आंदोलन

News Desk

मुंबईतून 50 उड्डाणे रद्द

News Desk
राजकारण

आत्तापर्यंत गेहलोत यांनी काय केले ? पायलट यांच्या समर्थकांचा सवाल

News Desk

नवी दिल्ली | “सचिन पायलट यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी प्रचंड कष्ट केले आहेत. त्यामुळे जर सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री केले नाही तर आपण काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार”, असा इशारा राजस्थानातील आमदार पी. आर. राणा यांनी दिला आहे. त्याचसोबत, “आत्तापर्यंत गेहलोत यांनी काय केले ?”, असा सवालही राणा यांनी केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. परंतु, आता राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करताना मोठा पेच निर्माण झाला आहे.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांची नावे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुचविली जात असून या दोन्ही नेत्यांचे समर्थक आता आक्रमक झाले आहेत. “राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सचिन पायलट यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळालेच पाहिजे. राजस्थानात निम्म्याहूनही अधिक आमदारांचे सचिन पायलट यांना समर्थन आहे. त्यामुळे तेच राजस्थानचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असे पी.आर.राणा यांनी म्हटले आहे. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन्ही नेत्यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीला बोलावून घेतले असून राजस्थानचा मुख्यमंत्री कोण याबाबतच निकाल आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची, शक्यता आहे. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Related posts

एमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

आता डान्सबारमध्ये प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक ?

News Desk

मुंबईत काय सुरू आहे !

News Desk