HW News Marathi
मुंबई

‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्र्यांना केले होते सावध

मुंबई | अंधेरी रेल्वे स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या घटनेत एकूण ५ जण जखमी झाले आहेत. पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत दमणच्या नागरिकाने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सावध केले होते.

अंधेरीच्या फलाट क्रमांक ८ आणि ९ वरील पादचारी पुलाची अवस्था बिकट असून या मोडकळीस आलेल्या पुलाबाबत कारवाई करावी असा संदेश देणारे ट्विट विशाल तांडेल या दमण नागरिकांनी केले होते. तांडेल यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर ट्विट करुन रेल्वे मंत्र्यांना सावध केले होते. ‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि भारत सरकार यांना ५ सप्टेंबर २०१७ रोजी ट्विटरवर पाठवला होता. त्याबरोबर पुलाची वाईट स्थिती दर्शविणारे फोटोही पाठवले होते. परंतु त्याची दखल घेतली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चात मुंबईकर जाती भेद विसरुन मदतीस आले

News Desk

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

News Desk
राजकारण

छिंदमच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल

News Desk

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण राज्याचा रोष ओढवून घेणाऱ्या श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ मधून २००० पेक्षा जास्त मतांसह विजयी झाला. परंतु, याबाबत आता आक्षेप घेण्यात आला आहे. छिंदमच्या विजयालाच आव्हान देणारी याचिका निलेश म्हसे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. निलेश म्हसे हे या निवडणुकीत छिंदमच्या विरोधात उभे राहिले होते. छिंदमची झालेली निवड रद्द ठरवावी, अशी मागणी देखील या याचिकेमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेमुळे छिंदमच्या अडचणीत वाढ होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत छिंदमने अपशब्द काढल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर संतप्त टीका झाली होती. त्यामुळेच छिंदमला भाजपमधून बाहेरची वाट दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्याने अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. धक्कादायक म्हणजे छिंदमवर यावेळी गुन्हा दाखल असून तो तडीपार होता तरीही, या निवडणुकीत जनमत छिंदमच्याच बाजूनेच झुकले. मात्र, आता छिंदमच्या विजयला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आल्याने छिंदमच्या अडचणीत वाढ झाली आहे. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

Related posts

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

Aprna

गंभीरने मुख्यमंत्री केजरीवालांसह ३ जणांवर ठोकला मानहानीचा दावा

News Desk

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

News Desk