HW News Marathi
मुंबई

चार रुपड्यासाठी इमान विकू नका: राज ठाकरेंचे प्रशासनाला खरमरीत पत्र

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपजिल्हाधिकाºयांना खरमरीत पत्र लिहिले आहे. मुंबईत परंप्रांतियांचे लोंढे वाढत असून ते रोखण्यासाठी संबंधितांना कुठलेही परवाने देऊ नये, त्यासाठी चिरीमिरी घेऊ नये, चार रुपड्यासाठी इमान विकू नका, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत परप्रांतियांचे आक्रमण वाढत आहे. त्यांना इथे आल्यानंतर सहज रेशन कार्ड, वाहन चालवण्याचे परवाने मिळतात. त्यानंतर ते झोपड्या बांधून येथे स्थायिक होतात. हा सर्व प्रकार थांबल्यास मराठी मुलांना येथे रोजगार उपलब्ध होईल, असे राज यांनी पात्रात म्हटले आहे. यासाठी प्रशासनाने डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावावे. कुठल्याही परप्रांतियांना यापुढे बेकायदा परवाने, अधिवास परवाने देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, हा प्रकार न रोखल्यास मनसे या सर्व बाबींत लक्ष्य घालेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

swarit

कासकरच्या हस्तकांनी खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

News Desk

लागला एकदाचा टीवाय बीकॉमचा ‘निक्काल’!

News Desk