HW News Marathi
मुंबई

प्रदूषणमुक्त हरित दिवाळीसाठी रहिवाशांचा पुढाकार

रुपेश दळवी

मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाक्यांची विक्री आणि वापरावर आणलेल्या निर्बंधांनंतर काही प्रमाणात सामान्य नागरिकही याला पाठिंबा देत आहेत. फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल झालेल्या जनजागृतीमुळे फटाक्यांचा वापर कमी होत आहे. मुंबईत चांदिवली भागातील नाहर अम्रितशक्ती या सोसायटीमधील रहिवाशांनी हरित दिवाळीचा संदेश दिला आहे. यावेळी रहिवाशांनी यंदाची दिवाळी फटाके न फोडता प्रदूषणमुक्त साजरी करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.

फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध लावल्यामुळे जवळपास देशभरातील 8 लाख कामागारांचा रोजगार हिरावला जात आहे. अशातच प्रदूषणाचा मुद्दाही नजरेआड करता येत नाही अशा प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहेत. अशातच वायूप्रदूषण व ध्वनी प्रदूषण रोखण्याचा हेतू असल्याचे इथल्या रहिवाशांनी सांगितले. यावेळी नाहर अम्रितशक्ती सोसायटीतील जवळपास शेकड़ो रहिवाशी या पुढाकारात सहभागी झाले होते. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी व्हावी अशी आमची इच्छा आहे. हरित दिवाळीचा हा संदेश आम्हाला केवळ आमच्या सोसायटीकरता न ठेवता संपूर्ण शहराला याबाबत जागरूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे रहिवासी रूपल बोके यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Manasi Devkar

आंबेडकरी चळवळीचा आणि पुरोगामी विचारांचा सच्चा पाईक हरपला: खा. अशोक चव्हाण

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk
महाराष्ट्र

एसटी संपाचा तिढा कायम

News Desk

मुंबई- एसटी संपाचा तिढा आज तिस-या दिवशीही कायम असून तो सुटण्याची लक्षणे दिसत नाही. एसटी कामगाार संघटना आपल्या पगार वाढीच्या मागणीवर ठाम आहे. तर सरकार मर्यादीत पगारवाढ देण्यास तयार आहे. ते मात्र एसटी संघटऩेला मान्य नाही.

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हवाच अशी भूमिकाही संघटनेनं घेतली आहे. त्यामुळे आजही हा संप सुरू आहे.

4 हजार ते 7 हजार ची पगारवाढ प्रशासनाने मान्य केलीय.पण हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे संघटनेनं स्पष्ट केले.

शासनाने 2.57 हजार कोटीची वाढ देण्याच मान्य केलंय. पण आम्हाला साडे 4 हजार कोटींची वाढ अपेक्षीत आहे

दरम्यान जे जास्तीत जास्त वेतनवाढ देणं शक्य होती ती ऑफर केल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

पण संघटनाच समाधान होत नाही. त्यामुळे बोलणी करण शक्य नाही. जी पगारवाढ दिली आहे ती गेल्या 77 वर्षातली सर्वात मोठी पगारवाढ असल्याचा दावा रावते यांनी केला. आता प्रशासन आणि कामगार संघटनेच्या वादात प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला – संजय राऊत

News Desk

सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचं विधान

News Desk

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

News Desk