HW News Marathi
मुंबई

यंदाही मुंबईची तुंबई होणार- पालिका

मुंबई : गतवर्षी पहिल्या पावसापासून अगदी वर्षभर सुरु असलेल्या प्रत्येक पावसात पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. २९ ऑगस्ट ही तारीख तर मुंबईकरांच्या चांगलीच स्मरणात राहीली आहे. गणेशोत्सवात मंडप पडल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे जणजीवन विस्कळीत झाले होते. यंदा पालिकेने केलेल्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये २२५ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता पालिकेकडून वर्तविण्यात आली आहे.

यंदा पाऊस कितीही प्रमाणात झाला तरीही पावसाळ्यात मुंबई तुंबणार हे निश्चित आहे. मेट्रो तसेच विविध कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे यंदा पाणी तुंबण्या-या जागांच्या संख्येत वाढ होणार आहे. दरवर्षी ६० ठिकाणी पाणी तुंबले जाते यंदा २२५ ठिकाणी तुंबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मुंबईकरांची नक्कीच गैरसोय होणार आहे.

कुठे होणार नागरीकांची गैरसोय

मुंबईमध्ये सध्या विविध ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. त्यापैकी वांद्रे पूर्व, भायखळा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव पश्चिम, बोरिवली पश्चिम, सायन, किंग्ज सर्कल, कुर्ला, वांद्रे, माहिम, खार, दादर, माटुंगा या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या पावसाचे पाणी उपसण्यासाठी माहापालिकेकडे १९ पंप आहेत, तर २७९ पंप भाड्याने घेतले जातात. यासाठी यंदा ५४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलीने पळून जावून प्रेमविवाह केला, तिकडे आई-वडिलांनी रेल्वेखाली जीव दिला

News Desk

वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेला’ प्लास्ट इंडियाची साथ

News Desk

१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा साथीदाराला मुंबईत आणले

swarit