HW News Marathi
मुंबई

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत | पवार

मुंबई | “भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून केले आहे. “शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत. परंतु, त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. संभाजी भिडे यांची पिलावळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक आहे, त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आम्ही कधीही जाणार नाही” असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर केले होते.

प्रकाश आंबेडकरांवर टीका केल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यावरही शरद पवार यांनी टीका केली आहे. मुस्लिमांशिवाय हिंदुत्व अपूर्ण आहे, असे म्हणणाऱ्या भागवत यांच्यावर पवार यांनी निशाणा साधला आहे. मुस्लिम, ख्रिश्चन हे सर्व जण देशाचेच घटक असून आपल्याला असणारे सर्व अधिकार त्यांनाही आहेत. त्यामुळे ते आपल्या देशाचाच भाग आहेत हे कुणीही वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात पवार यांनी भागवत यांना टोला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर हे काल (गुरुवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. “आम्ही काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक आहोत, परंतु राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही,” असे यावेळी आंबेडकर म्हणाले. यावर शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यातील दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. प्रकाश आंबेडकर हे मला आधी धर्मनिरपेक्ष वाटायचे, पण आता वाटत नाहीत,” असे शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

ठाण्यात पालिका पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला-तीन जण जखमी-दोघांना घेतले ताब्यात

News Desk

मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर पूरस्थिती.. मुंबईची झाली तुंबापुरी

News Desk
देश / विदेश

भारत-पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द

swarit

नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्र संघ (यूएनजीए) मध्ये भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांची होणार मुलाखत रद्द झाली. मुलाखत रद्द झाल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी माध्यमांना दिली. रवीश कुमार यांनी पुढे असे म्हटले की, पाकिस्तानच्या प्रधानमंत्री इमरान खान यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

या दोन्ही देशांच्या मंत्र्यांमुध्ये होणाऱ्या मुलाखती होण्यापुर्वीच संभ्रमचे वातावरण असताना भारत-पाक सीमेवर भारतीय लष्कराच्या शहीद जवानांचा मृत्युशी पाकिस्तानच्या सेन्यांनी विटंबना केली. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. या सर्व घटनामुळे भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास नकार दिला आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघ (युएनजीए)मध्ये पाकिस्तानी पराराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्याशी मुलाकात होणार होती. परंतु पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सतत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू असतो.

Related posts

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांचे ट्वीटद्वारे अभिवादन

News Desk

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

UP मध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला; योगी आदित्यनाथांचा निर्णय

Aprna