HW News Marathi
मुंबई

गायक नितीन बाली यांचे निधन

मुंबई | प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचे आज मुंबईत अपघाती निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. आज (मंगळवारी) ते बोरिवलीहून मालाडला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचारदेखील करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली म्हणून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळीच्या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

नितीन बाली हे ९०च्या दशकातील त्यांच्या रिमिक्स गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. नितीन बाली यांचे निले निले अंबर पे, छुकर मेरे मन को, पल पल दिल के पास यांसारख्या गाण्यांचे रिमिक्स अत्यंत प्रसिद्ध आहेत. दरम्यान गायक नितीन बाली यांच्या गाडीला जेव्हा अपघात झाला तेव्हा ते दारूच्या नशेत असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.

नितीन बाली यांचा अपघात झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचाऱ्यादरम्यानच त्यांचे निधन झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ कानमंत्र

Aprna

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो | राज ठाकरेंची टिप्पणी

News Desk

गुढीपाडवानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार!

News Desk