HW News Marathi
मुंबई

एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणात १७०० दुकानदार रस्त्यावर

मुंबई | मुंबईतील महत्त्वाच्या लालबहादूर शास्त्री मार्ग येथील या शीव ते मुलुंड मार्गाच्या रुंदीकरणात तब्बल १७०० दुकानदार रस्त्यावर आले आहेत. या प्रकरणी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला धारेवर धरले गाळेधारकांकडे पालिका प्रशासन १९६२ चे पुरावे का मागता असा सवाल करत गाळेधारकांचा व्यवसाय बुडणार असल्याने त्यांचे पुनर्वसन व्यावसायिक संकुल बांधून करा अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली आहे.

मुंबईतील एलबीएस मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामादरम्यान येणारी बांधकामे तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये मागील ४० वर्षापूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारकांचे गाळे तोडण्यात येत असल्याने पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या मार्गावरील एकूण दोन हजार बांधकामांपैकी तब्बल ८० टक्के बांधकामे व्यावसायिकांची असल्याचे त्यांनी सांगितले. यातील तोडलेल्या गाळेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे गाळेधारक आता नगरसेवकांकडे धाव घेत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

या गाळेधारकांना मुंबईबाहेर हाकलण्याचा पालिका प्रशासनाला डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे रमेश कोरगावकर, राजूल पटेल, सदानंद परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही पालिका प्रशासनाचा गाळेधारकांना हद्दपार करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तर रस्ता रुंदीकरणात गाळेधारकांचा व्यवसाय बुडणार असल्याने त्यांचे पुनर्वसन व्यावसायिक संकुल बांधून करा अशी मागणी नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी केली. या प्रकरणी गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संबंधित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी खास धोरण तयार करा. असे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी २००० सालापर्यंतचा नियम लावता मग वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांकडे १९६२ चे पुरावे कसे मागता असा सवालही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

उद्या या वर्षातला शेवटचा मेगाब्लॉक 

News Desk

वांद्रे गरीबनगरमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट, भीषन आग, 22 गाडया घटनास्थळी, video

News Desk
मुंबई

चौपाटयांवर जीवरक्षक नेमण्याप्रकरणीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

Gauri Tilekar

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक नेमण्या प्रकरणी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले आहेत. पालिका प्रशासनाने कोणतीही चौकशी न करता चौपाट्यांवर जीवरक्षक नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आणला. संबंधित कंत्राटदार काळ्या यादीतील असल्याने आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यास जोरदार आक्षेप घेत स्थायी समितीने प्रस्तावच फेटाळला. संबंधित कंत्राटदाराला सरकारी संस्थेने काळ्या यादीत टाकल्याने कंत्राटदाराला काम देऊ नये, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे आता जीवरक्षक नेमण्याबाबत पालिका प्रशासन काय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्‍सा, मनोरी आणि गोराई अशा सातही चौपाट्यांवर दररोज मुंबईकरांसह देश-विदेशांतील पर्यटकांची गर्दी होते. त्या ठिकाणी पालिकेचे 36 जीवरक्षक दोन पाळ्यांमध्ये तैनात असतात. त्यातील 12 जीवरक्षक कामयस्वरूपी आहेत. इतर जीवरक्षकांची कंत्राटी स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. जीवरक्षकांची संख्या वाढून 93 इतकी करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका 13 कोटी रुपये मोजणार आहे. जीवरक्षकांकडे लाइफ जॅकेट, रोप, सेफ्टी ट्युब, रिंग आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. गोव्याच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे. दृष्टी लाईफ सेव्हिंग प्रा. लि. कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात येणार होते; परंतु तिचा काळ्या यादीत समावेश असल्याने त्याविरोधात समितीत आक्षेप घेण्यात आला. दृष्टी लाईफ’च्या राजीव सोमाणी आणि नटवर सोमाणी यांच्या नावाने दृष्टी स्पोर्टस्‌ कंपनी होती. त्या कंपनीवर राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने गुन्हा नोंदवला आहे. त्या कंपनीला पर्यटन मंडळाने काळ्या यादीत टाकले आहे. असे असताना त्यांना काम का देण्यात येत आहे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. संबंधित कंत्राटदाराला काम देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. रवी राजा यांच्या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. त्याबाबत सविस्तर माहिती स्थायी समितीला सादर करण्याच्या सूचना करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्तावच फेटाळला.

Related posts

हल्ला बोल यात्रा’ नसून ‘डल्ला मार यात्रा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

सुनील शितपचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

News Desk

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat