HW News Marathi
मुंबई

सत्तेसाठी लांडगे एकत्र आले, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका

मुंबई | भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. विशेषतः शरद पवार यांच्या टीकेला फडणवीस यांनी जाहीर सभेतून उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, चहावाल्यांच्या नादी लागू नका, आम्ही चहा पितो, परंतु राष्ट्रवादीचे लोक जे पितात, ते आम्ही कुणाला पाजत नाही. सध्या दोन्ही कॉँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, त्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सत्तेच्या शिकारीसाठी लांडगे एकत्र आले आहेत. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की, भाजप हा पक्ष सिंहाच पक्ष आहे, त्यामुले कितीही लांडगे आले तरी आम्ही डगमगणार नाहीत. विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चावरही त्यांनी टीका केली.

राज्याच्या टिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांनो हल्लाबोल काय करता, असे ते म्हणाले. असे असले तरी येता काळ महत्वाचा आहे. विरोधकांकडून दिन-दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, त्याला बळी पडू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले. विरोधक सत्तेसाठी बुद्धीभेद करतील, तेढ निर्माण करतील त्याला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, संविधानाने दलित, आदिवासींना दिलेले आरक्षण कोणीच हिरावून घेणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विरोधकांच्या टीकेला जनता बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फोन टॅपमुळे सेनेच्या उपविभागप्रमुखांची हकलपट्टी

swarit

पुणे जिल्ह्यातील नवीन विमानतळासाठी आवश्यक परवानग्यांचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार- मदन येरावार

News Desk

राज्यात येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

News Desk
महाराष्ट्र

भाजप शक्तिप्रदर्शन स्वबळावरील सत्तेसाठी

News Desk

मुंबई | भाजपने वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. सुमारे साडेतीन लाख कार्यकर्त्यांसाठी अलिशान शामियाना उभारून भाजपने आपली आर्थिक ताकद तर दाखवून दिली शिवाय, इतर पक्षांना खुजे ठरवण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसते.

विशेषतः शिवसेनेचा प्रभाव असलेल्या वांद्रा परिसरात हा मेळावा घेऊन भाजपने सर्वप्रथम आपला मित्रपक्ष शिवसेना व उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. पक्षाचा जरी मेळावा असला तरी आगामी निवडणुकात दुबळ्या विरोधकांवर मात करण्यासोबत मित्रपक्षाशिवाय पुन्हा सत्ता स्थापन्याची रणनीती या निमित्ताने ठरण्याचे संकेत देण्यात आले.

भाजपच्या विरोधात वातावरण तयार करण्यात विरोधकांना यश येताना दिसू लागताच भाजपने शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे शिवसेना स्वबळावर ठाम असल्याने भाजपने वर्धापन दिन मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यावर भर दिला आहे.

उद्या वेळ आल्यास भाजपला स्वबळावर निवडणुका लढाव्या लागणार आहेत, त्यात पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी आतापासून भाजपने तयारी चालवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील लाखो कार्यकर्ते मुंबईत आणण्यात आले आहेत.

भाजपच्या शक्तिप्रदर्शनाविषयी विरोधकांच्या प्रतिक्रीया अद्याप आल्या नसल्या तरी त्यावर उद्यापासून टीका होण्यास सुरुवात होईल. तुर्तात पक्षाला उभारी देण्याचे काम भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा केल्याच्या आजच्या मेळाव्यावरून स्पष्ट होत आहे.

Related posts

केंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य; सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही

Aprna

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

News Desk

आज मराठा आरक्षणाचा निकाल

News Desk