HW News Marathi
मुंबई

सत्तेसाठी लांडगे एकत्र आले, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका

मुंबई | भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. विशेषतः शरद पवार यांच्या टीकेला फडणवीस यांनी जाहीर सभेतून उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, चहावाल्यांच्या नादी लागू नका, आम्ही चहा पितो, परंतु राष्ट्रवादीचे लोक जे पितात, ते आम्ही कुणाला पाजत नाही. सध्या दोन्ही कॉँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, त्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सत्तेच्या शिकारीसाठी लांडगे एकत्र आले आहेत. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की, भाजप हा पक्ष सिंहाच पक्ष आहे, त्यामुले कितीही लांडगे आले तरी आम्ही डगमगणार नाहीत. विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चावरही त्यांनी टीका केली.

राज्याच्या टिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांनो हल्लाबोल काय करता, असे ते म्हणाले. असे असले तरी येता काळ महत्वाचा आहे. विरोधकांकडून दिन-दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, त्याला बळी पडू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले. विरोधक सत्तेसाठी बुद्धीभेद करतील, तेढ निर्माण करतील त्याला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, संविधानाने दलित, आदिवासींना दिलेले आरक्षण कोणीच हिरावून घेणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विरोधकांच्या टीकेला जनता बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकलमध्ये महिलेची प्रसुती

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीतच

swarit

BMC Elections: मुंबई पालिकेसाठी भाजपचा पुढचा प्लॅन काय?

Manasi Devkar