HW News Marathi
देश / विदेश

जैशची मोदींना धमकी

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याने भारतीय मुस्लिम समाजाला चिथवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. मुस्लिम समाजाचं रक्त मौल्यवान आहे ते सांडाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील असा इशारा मौलाना मसूद अजहरनं दिला आहे.

तुम्ही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, षडयंत्र रचा किंवा फाशी द्या मुस्लिम समाज असल्या गोष्टींना कधीच घाबरत नाही. भारत आणि काश्मीर या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा जो छळ होतो तो पाहून आमचा जीव जळतो, असंही मसूदनं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात एक कॉलम सुरू करत मौलाना मसूद यानं ही गरळ ओकली आहे.

माज्या या नव्या कॉलममुळे भारताचा जळफळाट होणार आहे मात्र मला त्यानं काहीही फरक पडत नाही भारतात ज्या काही कारवाया झाल्या त्या आता माज्या फाईलमध्ये वळविण्यात येतील हेदेखील मला ठाऊक आहे असंही मसूदनं म्हटलं आहे. पठाणकोट, नगरौटा, गुरादासपूर आणि अखनूर हल्ल्यांत स्थानिक लोक मारले गेले आहेत ज्यामागे जैशचा हात होता असंही मसूदनं म्हटलं आहे. तसंच भारतात होणाºय गोरक्षकांकडून मुस्लिम समाजातल्या मुलांची हत्या केली जाते आहे ही बाब निषेधार्ह आहे. गायीच्या रक्षणासाठी आमच्या लोकांचं रक्त पाटाच्या पाण्यासारखं वाहिलं जातंय आम्ही हे कदापि सहन करणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे!

News Desk

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद

Aprna

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार!

News Desk