HW News Marathi
देश / विदेश

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यानी अखेरचा श्वास घेतला. कवी, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी असे अष्टपैलू असलेल्या वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे.

केंद्रसरकार कडून सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीच्या राजघाटावरील राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रध्यक्ष अमित शहा सहभागी झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“काही मिनिटांतच जमिनीचा भाव कसा दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?”, सेनेचा सवाल

News Desk

गुजरातसाठी भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

Darrell Miranda

गोल्डन बॉयचा मोठा सन्मान, संरक्षण मंत्री म्हणाले-..

News Desk
देश / विदेश

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे १६७ जणांचा मृत्यू

swarit

तिरुअनंतपुरम | केरळमध्ये मुसळधार पावसाने येथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६७ जणांचा मृत्यू झाला असून ८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. लाखोच्या संख्येने नागरिक बेघर झाले आहेत. एनडीआरएफच्या पाटी टीम तिरुअनंतपुरमध्ये दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे बस आणि रेल्वे फटका बसला आहे. पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आवाहन

केरळमधील पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचे स्वरूप आले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे.

Related posts

हमजा बिन लादेनचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश

News Desk

पेगॅसस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा! – नाना पटोले

Aprna

‘जागतिक मानक दिन’ का साजरा केला जातो, वाचा सविस्तर…

News Desk