HW News Marathi
देश / विदेश

कोणी घर देता का घर !

बिलासपूर | कोणी घर देत का घर… असा नटसम्राट या प्रसिद्ध मराठी नाटकातील हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच परंतु आता खऱ्या आयुष्यात देखील असे म्हणण्याची वेळ बिलासपूरमधील एका ६० वर्षीय महिलेवर आली आहे. या महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी महिलेने काही पैसे सुद्धा भरले होते. परंतु, अद्याप तिला घर भेटले नाही. त्यामुळे सध्या या महिलेला कच्च्या घरात राहावे लागत आहे.

या महिलेने घरासाठी ८० हजार रुपयांचा हप्ता सुद्धा भरला आहे. तिला अद्याप घर भेटले नाही. यासंबंधीच्या अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले. परंतु त्यांनी यावर चर्चा करण्याचे टाळले. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली आहे, असे या गावच्या सरपंचानी सांगितले. तर, तक्रारदार महिला म्हणाली की, सरकारी अधिकाऱ्यांनी माझे घर चोरी केले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठी मी पैसे सुद्धा भरले आहेत. मात्र, मला अद्याप घर मिळाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

तेलंगणामधील कोंडागट्ट घाटात बस कोसळून ४५ प्रवाशांचा मृत्यू

swarit

लाल किल्ल्यात घुसले अतिरेकी

News Desk
महाराष्ट्र

Bhima Koregaon Case : नवलखांना अटक करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

News Desk

नवी दिल्ली | भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी संशयित आरोपी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना अटक करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने शपथपत्र सादर केले असून गौतम नवलखा यांच्या अटकेची परवानगी देण्याची मागणी केली आहे. इतर आरोपींसह गौतम यांचा जवळून संबंध असल्याचे पुरावे हाती लागल्याचेही पोलिसांनी या शपथ पत्रात म्हटले आहे.

गौतम नवलखा यांच्यावर असलेले गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवत अन्य आरोपींसह गौतम नवलखा यांना अटक करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना १ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी गौतम नवलखा यांच्यासह पाच विचारवंताना पुणे पोलिसांनी अटक केली होती. मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यासह नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी त्यांच्यावर लावला होता.

Related posts

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

News Desk

महाराष्ट्रात जरी आघाडीचं सरकार असलं तरी बाळासाहेब थोरातांना बळकट करायचे आहे, पृथ्वीराज चव्हाणांचे सुचक वक्तव्य

News Desk

मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांकडून एकजण ताब्यात

News Desk