HW News Marathi
देश / विदेश

कोणी घर देता का घर !

बिलासपूर | कोणी घर देत का घर… असा नटसम्राट या प्रसिद्ध मराठी नाटकातील हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच परंतु आता खऱ्या आयुष्यात देखील असे म्हणण्याची वेळ बिलासपूरमधील एका ६० वर्षीय महिलेवर आली आहे. या महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी महिलेने काही पैसे सुद्धा भरले होते. परंतु, अद्याप तिला घर भेटले नाही. त्यामुळे सध्या या महिलेला कच्च्या घरात राहावे लागत आहे.

या महिलेने घरासाठी ८० हजार रुपयांचा हप्ता सुद्धा भरला आहे. तिला अद्याप घर भेटले नाही. यासंबंधीच्या अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले. परंतु त्यांनी यावर चर्चा करण्याचे टाळले. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली आहे, असे या गावच्या सरपंचानी सांगितले. तर, तक्रारदार महिला म्हणाली की, सरकारी अधिकाऱ्यांनी माझे घर चोरी केले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठी मी पैसे सुद्धा भरले आहेत. मात्र, मला अद्याप घर मिळाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NEET  व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक ?

News Desk

गोव्याच्या मंत्रीमंडळाची आज पुनर्रचना, ४ नव्या मंत्र्यांना मिळणार ‘ही’ जबाबदारी

News Desk

नवे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता

News Desk