HW News Marathi
देश / विदेश

सिक्‍कीममधील घुसखोरीचा चीनी सैनिकांचा डाव, भारतीय जवानांनी उधळून लावला कट

नवी दिल्ली । भारत आज (२६ जानेवारी) आपला ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना चीनकडून सीमा भागांत सातत्याने कुरघोडी सुरूच आहेत. पूर्व लडाखच्या सीमांवर पेटलेला संघर्ष, अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करून संपूर्ण गाव वसविण्याची केलेली कुरघोडी अशा चीनच्या कुरापती सतत सुरू आहेत. त्यातच आता भारताच्या प्रजासत्ताकदिनी चिनी सैनिकांकडून सिक्‍कीममध्येही घुसखोरी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा हा डाव उधळून लावला आहे. यावेळी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठी हाणामारी झाली असून त्यात चीनचे २० तर भारताचे ४ जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

देशाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी सिक्‍कीमच्या नाकुला सीमेवर ही घुसखोरी केली. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि चीन यांच्यादरम्यानचा मॅकमोहन सीमेवरील नाकुला पास हा अतिशय संवेदनशील भाग आहे. मात्र, चीनला मॅकमोहन रेषा मान्य नाही. त्यामुळे चीन सिक्‍कीम आणि अरुणाचल प्रदेशातील अनेक भारतीय चौक्यांच्या आपला अधिकार सांगत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, यावेळी चीनने नाकुला सीमाभागात थेट घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चीनचा हा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनापासून वाचण्यासाठी पंतप्रधान करणार जनआंदोलन!

News Desk

महाराष्ट्रातील ७ मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

News Desk

…नाहीतर वसईतही दिल्लीसारखीच परिस्थिती उद्भवली असती !

News Desk