HW News Marathi
देश / विदेश

आठवीच्या पुस्तकात बाळ गंगाधर टिळक दहशवादाचे जनक

नवी दिल्ली : राज्यस्थानमधील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स पुस्तकात बाळ गंगाधर टिळक हे दहशवादाचे जनक असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे. या पुस्तकामध्ये टिळकांबदल जे छापले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोड फुटले असून महाराष्ट्रात या प्रकरणाचे किती तीव्र पडसाद पडतील हे येता काळाच सांगू शकेल. या प्रकरणा बदल राजस्थान सरकार काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

धड्यात टिळकांबदल नेमके काय म्हटले

‘अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे.’ टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. राज्यस्थानमधील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरेन्स पुस्तकात असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात, असे या धड्यात म्हटले आहे. शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे देखील या धड्यात म्हटले गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुजरात विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये बंडखोरी

Darrell Miranda

उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था खालावली, प्रियंका गांधींचा योगींना टोला

News Desk

‘भीतीपोटीच आरबीआयच्या नियंत्रणाला पवारांचा विरोध’, भाजपचा पलटवार

News Desk
मुंबई

नालेसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष, धारावीतील शेटवाडी नाला गाळ कच-याने तुडुंब

News Desk

मुंबई : धारावीतील शेटवाडी नाला गाळाने व कच-याने तुडुंब भरला आहे. या नाल्यातील पाणी गेल्या अनेक वर्षांपासून नाल्याच्या आसपास असलेल्या घरांमध्ये शिरते. त्यामुळे परिसरातील नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. महापालिकेने सालाबादाप्रमाणे यंदाही हलगर्जीपणा केल्यामुळे विभागात अद्याप नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे धारावीचा शेटवाडी नाला यंदाही पावसाळ्यात ओसंडून वाहण्याची शक्यता विभागातील नागरीक व्यक्त करत आहेत.

सध्या हा नाला भरल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विभागात डास प्रचंड प्रमाणात वाढले असून लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक नगरसेवक मात्र नाल्याची सफाई न करता रस्त्यांची डागडुजी आणि इतर बाबींना विषेश महत्व देत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी हा नाला उशीरा साफ केला जातो त्यामुळे पावसाळ्या दरम्यान सुरु झालेल्या नालेसफाईत हा नाला पुर्णपणे स्वच्छ होत नसल्याचे स्थानिक नागरीक सांगतात.

नाल्यात परिसरात असलेल्या कारखाण्यांचे सांडपाणी तसेच शौचालायाचे घाण देखील सोडली जाते. त्यामुळे या नाल्यावरुन जाताना लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या नाल्याजवळ रहाणा-या लोकांनी गेल्या अनेक वर्षात आपल्या घराच्या खिडक्या उघडलेल्या नाहीत. दरवर्षी नालेसफाई एप्रिल महिन्यात सुरु होते परंतु यंदा मे चा पहिला आठवड संपला तरीही अद्याप या नाल्याची स्वच्छता झाल्याचे दिसत नाही. पालिका अधिका-यांन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेटवाडी नाल्याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk

राज्यावरील कोरोनाचे, निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल – अजित पवार

swarit

संघ आणि भाजपविरोधातील विचारधारेची लढाई !

News Desk