HW News Marathi
देश / विदेश

भारत-मालदीव संबंध धोक्यात

नवी दिल्ली|भारताकडून मालदीवमध्ये तैनात केले गेलेले दोन हॅलिकॉपटर आणि ५० सैनिक मागे घेण्याची सूचना मालदीव सरकारने भारताला केली आहे. मालदीवच्या आता स्वतःची सेवा सुरु केल्यामुळे भारताकडून येणारी हि सेवा मागे घेण्याची सूचना मालदीव सरकारने केली असल्याची माहिती मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यांनी भारत सरकारला दिली. आपतकालीन परिस्थितीत रुग्णांना वाहून नेण्यासाठी ह्या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जाई.

मालदीवची चीनसोबत वाढणारी जवळीक आणि मालदीववर चीनचे वाढते वर्चस्व ही देखील ह्या सुचने मागचे कारण असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मालदीवमधून भारताची पाळेमुळे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यमीन यांनी ‘भारतीय कर्मचाऱ्यांचा व्हिसा संपला असल्यानं त्यांनी भारतात परत जावे’ असे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विना अनुदानित सिलेंडर ४८ रुपयांनी महागला

News Desk

ठाकरे संकटात सापडले की शत्रूला अधिक घातक ठरतात ! संजय राऊतांचा इशारा

News Desk

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी

News Desk
मुंबई

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी एटीएसने १२ जणांना ताब्यात घेतले

News Desk

मुंबई | नालासोपारा देशी बॉम्ब प्रकरणी पुण्यातील आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये एटीएसची मोठी धरपकड सुरू आहे.

नालासोपाऱ्यातून वैभव राऊत याला महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने अटक केल्यानंतर, आणखी दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शरद काळसकर आणि गोंधळेकर अशा आणखी दोघांना वसईतून अटक करण्यात आली. वैभव राऊत याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. घातपात कटप्रकरणी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, नालासोपारामध्ये कारवाई सुरू आहे.

नालासोपाऱ्यातील भांडारआळी परिसरात सनातन संस्थेचा वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर एटीएसच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा घातला. वैभव राऊत याच्या घरातून आठ देशी बॉम्ब हस्तगत केले. सरकारी वकीलांकडून न्यायालयात याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून आरोपींकडून ८ नाही तर २० बॉम्ब जप्त करण्यात आल्याची माहिती वकीलांनी दिली आहे. तसेच ५० बॉम्ब बनू शकतील इतके साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी सापडलेली स्फोटकं साधने –

२ जिलेटिन स्टिक्स

४ इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स

२२ नॉन इलेक्ट्रोनिक डिटोनेटर्स

सुरक्षा फ्यूज वायरर्स

व्हाईट पाउडर स्टिक, वृत्तपत्रामध्ये गुंढळलेली

२ पॉईंजन बॉटल सारख, प्रत्येकी १ लिटर

एका बॉक्समध्ये ६ व्होल्ट्सच्या १० बॅटरी

कटर आणि ब्लेड

सोल्ड्रिंग मशीन आणि उपकरणे

३ स्विचेस

३ विशिष्ट सर्किट (१ पूर्ण आणि २ अपूर्ण)

बॅटरी कनेक्टर

२ बॅटरी कंटेनर

४ रिले स्विच

८ रजिस्टर्स

६ ट्रांजिस्टर्स वायरचे काही भाग

हात मोजे

स्टिकिंग साहित्य

वायरिंगचे आलेख

Related posts

भांडुप उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरची धडक 

swarit

नीरव मोदीची प्रतिकृती बनवत मुंबईतील बीडीडी चाळीत सर्वात मोठी होळी

News Desk

भारतमाता चित्रपटगृहासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

swarit