HW News Marathi
देश / विदेश

सबरीमाला मंदिराचे पुजारी म्हणतात, ‘आता या चर्चेला अर्थ नाही’

थिरुवनंतपुरम | केरळ सरकारने सबरीमाला मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली असताना. परंतु मंदिराच्या एका पुजा-याने ‘आता ही चर्चा करण्याला काहीही अर्थ राहिलेला नाही’ असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याची बंदी रद्द ठरविल्यानंतरही न्यायालयाच्या या निर्णयावर सरकार आणि पुजारी यांच्यात चर्चा होणार होती. मात्र मंदिराच्या पुजाऱ्यांच्या या भूमिकेमुळे ही चर्चा होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (सोमवारी) तंत्री कुटुंब आणि पंडालम राजघराण्यातील सदस्यांना चर्चेसाठी बोलावल्याची माहिती मिळते. मात्र त्यांनी आता सरकारशी चर्चा करण्यात काहीही अर्थ राहिलेला नसून सरकार न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध विचारच करायला तयार नाही, असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला प्रकरणी आपला निकाल जाहीर करताना “स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव करणे अत्यंत चुकीचे आहे. देवाशी असलेले नाते हे शारीरिक घटकांवरून ठरू शकत नाहीत,” असे स्पष्ट केले होते.

केरळमध्ये सबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची बंदी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार व्हावा यासाठी आम्ही याचिका करू त्याबाबत पंडालम राजघराण्याची भूमिका समजून घेऊन आणि त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा करू, असे चेंगनूर यांनी सांगितले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ठराविक वयातील महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेशाची असलेली बंदी २८ सप्टेंबर रोजी बेकायदा ठरविली होती. याआधी ‘सबरीमाला मंदिराकडून महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून धार्मिक बाबतीत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये,’ अशी उलट भूमिका मंदिर प्रशासनाने घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारत सरकारने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली

News Desk

जम्मू-काश्मीर अन् लडाख मध्यरात्रीपासून केंद्रशासित प्रदेश

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर पडा, भाजपशी युती करा ! आठवलेंचीही उद्धव ठाकरेंना साद

News Desk
महाराष्ट्र

२०१९ च्या निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांचा दावा

Gauri Tilekar

लातूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवारी) लातूरमधील अटल महाआरोग्य शिबिराच्या उदघाटनासाठी आले होते. “२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री असेन,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे. “शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरण आणि सेवासुविधांसाठी तीन टप्प्यात १०० कोटींचा निधी देण्यात येईल. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा तिन्ही टप्प्यातील निधी माझ्याच कार्यकाळात मिळेल. कारण २०१९ च्या निवडुकांनंतरही मीच मुख्यमंत्री असणार आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“यंदा मराठवाड्यात ७० टक्क्यांपेक्षा देखील कमी पाऊस झाला आहे.मात्र या कठीण परिस्थितीत सरकार खंबीरपणे लोकांच्या पाठीशी आहे. आधीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना केवळ ७ हजार कोटींची मदत मिळाली होती. मात्र आम्ही फक्त चार वर्षांत २२ हजार कोटींची मदत दिली आहे. २०२२ पर्यंत १२ लाख बेघरांना घर मिळेल,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस ‘आयुष्यमान भारत योजने’चीही माहिती दिली आहे.

यंदा महाराष्ट्रात मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती आहे. यासंदर्भात पंचनामा सुरु आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाईची स्थिती समोर येईल. यासंदर्भात केंद्राची पाहणी पूर्ण झाल्यानंतर तेथे दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली आहे. त्याचप्रमाणे “मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या लढ्यात सरकार मागे हटणार नाही,” असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Related posts

नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलेत, तर मी आणि रश्मी घर सोडून जाईन !

News Desk

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

Aprna

भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा? जयंत पाटलांचे सूचक ट्विट

News Desk