HW News Marathi
देश / विदेश

राज्यात पेट्रोल दरात पाच नव्हे तर केवळ साडेचार रुपयांची कपात

मुंबई | देशात गेल्या काही दिवसात इंधनाच्या किंमतींमध्ये दर दिवशी वाढ होताना दिसत होती. मात्र काल (४ ऑक्‍टोबर) अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून पेट्रोल डिझेलच्या उत्‍पादन शुल्‍कात प्रतिलिटर दीड रूपयांनी कपात करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच राज्‍यात पेट्रोल ५ रुपयांनी स्‍वस्‍त होणार अशी देखील घोषणा करण्यात आली होती. राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कपात केल्यानंतर देशातील सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत होते. मात्र प्रत्‍यक्षात अंमलबजावणी होताना ही कपात केवळ ४ रूपये ३५ पैसे एवढीच आहे, असे लक्षात आले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील व्यापारी युद्धामुळे भारताला इंधन दरवाढीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत असल्याने, कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी नव्वदी पार केली होती. भाजप सरकारच्या काळात सातत्याने वाढणाऱ्या महागाई विरोधात काँग्रेससह इतर २१ पक्षांनी १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. मात्र या आंदोलनाचा देशातील इंधन दरवाढीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नव्हता.

सर्व सामान्यांची पुन्हा फसवणूक

राज्यात पेट्रोलच्या किंमतींमध्ये किमान पाच रुपये कपात होणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात पूर्ण पाच रुपयाची कपात न झाल्याने सामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे पुन्हा जनतेची ६५ पैशांची फसवणूक झाल्‍याचा आरोप देखील सर्वसामान्यांकडून केला जात आहे.

राज्यातील पेट्रोलचा आजचा दर

पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी केल्‍याची घोषणा केली असली तरी प्रत्‍यक्षात अंमलबजावणी ४ रूपये ३५ पैशांची झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८७.०४ असून औरंगाबाद ८८. ०२,परभणी ८८.७३ ,नांदेड ८८. ६०, अमरावती ८८. २३, पुणे ८६. ७६ असा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, लोकसभेत भाजपची मागणी

News Desk

आंध्र प्रदेशमधील आजी-माजी आमदरांची गोळ्या झाडून हत्या

swarit

निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा होणार का?

News Desk