HW News Marathi
देश / विदेश

नवाज शरीफ यांची सुटका, शिक्षेवर स्थगिती

इस्लामाबाद । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, मुलगी मरियम नवाज आणि जावई मोहम्मद यांना इस्‍लमाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने नवाज या तिघांच्याही शिक्षेवर स्थगिती आणली असून त्यांची सुटकादेखील करण्यात आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता.

इस्लामाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाचे न्यायाधीश अतहर मिनाल्लाह आणि न्या. हसन औरंगजेब यांनी हा निर्णय दिला. शरीफ यांच्या कुटुबीयांचे लंडनमध्ये 4 लक्झरी फ्लॅट आहेत, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हे तिघेही या आरोपाखाली शिक्षा भोगत होते. मात्र आता इस्लामाबाद हायकोर्टाकडून त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आणली गेली असून त्यांची सुटका करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील सर्वसाधारण निवडणुकांपूर्वी शरीफ यांनी आपल्या मुलीसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यावेळी, नवाज शरीफ यांना 10 वर्षांची, मरयम यांना 7 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तापमान बदलल्याने कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ

News Desk

अॅपलच्या एरिया मॅनेजरची गोळी घालून हत्या

News Desk

दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभुमीवर हाय अलर्ट

swarit
मनोरंजन

लालबागचा राजा मंडळात झालेल्या धक्काबुकी प्रकरणी धर्मादाय आयुक्त डिगेंची चौकशी

News Desk

मुंबई । लालबागचा राजा मंडळात काल (मंगळवार १८) घडलेल्या संतापजनक प्रकाराबाबत सर्व स्तरातून टीका झाल्या. त्यानंतर घडलेल्या प्रकारची दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे नुकतेच लालबागचा राजा मंडळाच्या मंडपात दाखल झाले. डिगे काल आयपीएस अधिकाऱ्यासोबत केलेल्या धक्काबुक्की आणि मुजोरी केल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली.

आयुक्तांनी घेतलेल्या या दखलीमुळे लालबागचा राजा मंडळावर सरकारचे नियंत्रण तर येणार नाही ना ? असे प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. डिगे यांना सचिव साळवी यांनी कालचे प्रकरण मिटले असून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली.

गणेशोत्सवादरम्यान या मंडळाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी राज्य सरकारचे लाखो रुपये खर्च होतात. तसेच या मंडळात कार्यकर्त्यांची वाढलेली मुजोरी पाहता या मंडळावर सरकारचे नियंत्रण असावे अशा चर्चांना गेल्या अनेक वर्षांपासून उधाण आले आहे. मात्र, या मंडळात दरवर्षी होणारी दादागिरीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकार महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related posts

अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

News Desk

गुडी उभी दारात, आरोग्य येई घरात

News Desk

अभिनेता सलमान खानला वनविभागाची नोटीस

News Desk