HW News Marathi
देश / विदेश

एअर इंडिया अधिकृतरित्या टाटा समूहाकडे स्वाधीन

नवी दिल्ली | बहुप्रतिक्षित असलेले एअर इंडियाचे मालकी हस्तांतरण प्रक्रिय अखेर आज पूर्ण झाली आहे. केंद्र सरकार आणि टाटा समूह यांच्यात आज (२७ जानेवारी) शेवटची प्रक्रियापूर्ण झाली असून आता एअर इंडिया पूर्णपणे टाटाच्या मालकीची झाली आहे. यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. एअर इंडिया अधिकृतरित्या टाटा समूहाकडे स्वाधीन झाल्याची घोषणा त्यांनी केली आहे. 

एअर इंडिया तोट्यात असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी टाटा समुहाने १८ हजार कोटी रुपयाची बोली लावून एअर इंडियाला पुन्हा एकदा आपल्याकडे घेतले होते. एअर इंडिया पुन्हा एकदा टाटाकडे आल्याचा आनंद असून एअर इंडियाला चांगली एअरलाईन्स बनवण्याचा निर्धार बनविला आहे, असा निर्धार असल्याचे एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : मध्यस्थी समितीची नेमणूक

News Desk

गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा

News Desk

Ayodhya land dispute case: सर्वोच्च न्यायालयात २ ऑगस्टपासून नियमित सुनावणी

News Desk