HW News Marathi
देश / विदेश

आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत | इम्रान खान

नवी दिल्ली | ‘आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. भारतासोबत सलोख्याचे संबंध राखल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा कमी होण्यास मदत होईल आणि मानवी संसाधनांचा वापर विकासासाठी करता येईल,’ असेही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यावेळी म्हणाले आहेत. सध्या भारतात फक्त २०१९ च्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे भारतातील आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मी भारतापुढे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करेन, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानचाही उल्लेख केला आहे

इम्रान खान सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारत आणि पाकिस्‍तानमधील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर शांततेसाठी चर्चा सुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण बैठकीत सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची भेट व्हावी यासाठी इम्रान खान प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत होते. मात्र दरम्यानच्या काळात पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे, घुसखोरी आणि भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्यामुळे भारताने पाकिस्तान सोबतच्या या चर्चेला नकार दिला होता.

भारताने भेटीसाठी नकार दिल्यानंतर इम्रान खान यांनी ट्ववीटद्वारे ‘भारत गर्विष्ठ आहे’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. “मी दिलेल्या भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यानचा शांतेसाठीच्या प्रस्तावाला भारताकडून आलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे मी निराश झालो आहे. भारत गर्विष्ठ आहे. माझे संपूर्ण आयुष्य अशा लहान माणसांनी व्यापलेले आहे जे मोठ्या कार्यालयावर वर्चस्व स्थापन करतात पण त्यांना उद्याची मोठी स्वप्न पाहण्याची दृष्टी नाही,” या शब्दात खान यांनी संताप व्यक्त केला होता.

Related posts

कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

News Desk

जेव्हा सर्वोच्च न्यायालय पगार वाढीवर बोलते…

News Desk

विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही, भ्रमातून प्रथम बाहेर !

News Desk
राजकारण

सेना-भाजपचे नेते आमच्या संपर्कात | अशोक चव्हाण

Gauri Tilekar

मुंबई । अनेक चांगली माणसे चुकीच्या पक्षात गेली होती, ती आता परत येऊ इच्छितात. त्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाने प्रवेश दिला जाईल. योग्यवेळी त्या व्यक्तींची नावे जाहीर करू,असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ,खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना व भाजपाचे काही खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

भाजपा नेते एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांना ही आम्ही प्रवेश देऊ असे ही ते म्हणाले. विद्यमान खासदार परत आल्याने काँग्रेस, राष्टवादीच्या जागा वाटपावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.अनेक जण भाजपात गेले ,पण तेथे गेल्यावर त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैतागले आहेत. असे चव्हाण म्हणाले .

जलशिवार योजना फोल ठरल्याचा आरोपसुद्धा चव्हाण यांनी केला. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनही भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जलशिवार योजना हा एक घोटाळा आहे.अशी टीका चव्हाण यांनी भाजप सरकारवर केली आहे.

Related posts

संजय राऊतांचा अजित पवारांना मेसेज, कारण गुलदस्त्यात

News Desk

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk

पवारांचे प्रयत्न निष्फळ, उदयनराजे-निंबाळकरांमधील वाद टोकाला

News Desk