HW News Marathi
राजकारण

संजय राऊतांचा अजित पवारांना मेसेज, कारण गुलदस्त्यात

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता १० दिवस होत आले तरीही राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष मात्र संपण्याचे नाव घेत नाही. सत्तस्थपनेच्या मुद्द्यावरून महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपकडून एकमेकांविरुद्धच दबावाचे राजकारण केले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी अशी नवी समीकरणे तयार होऊ शकतात अशा चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मेसेज आल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. “विधानसभा निवडणुकीच्या या संपूर्ण काळात आज पहिल्यांदाच मला संजय राऊत यांचा मेसेज आला असून आता मी त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलेन”, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले आहे. संजय राऊत यांच्या या मेसेजमागचे कारण जरी अद्याप गुलदस्त्यात असले तर राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या जुळवाजुळवीच्या पार्श्वभूमीवर या २ पक्षांमध्ये चर्चा सुरु असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी शिवसेनेकडे १७५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या माहितीनुसार संजय राऊत यांनी केलेल्या मेसेजमुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आता सत्तास्थापनेसाठी एकत्र येऊन भाजपची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. “यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या या संपूर्ण काळात आज पहिल्यांदाच मला संजय राऊत यांचा मेसेज आला . त्यांचा मेसेज आला तेव्हा मी पक्षाच्या बैठकीत होतो. संजय राऊत ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे आता मी त्यांना फोनच करून त्यांच्याशी बोलेन. खासदार साहेब काय काम आहे ? म्हणून त्यांना विचारेन”, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजयराव राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती पैसे घेतले…

News Desk

चौकीदार चौर नही चौकन्ना है | पंतप्रधान मोदी

News Desk

आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आंदोलकांनी अहिंसा आणि शांततेचा मार्ग अवलंबावा

News Desk