HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव- मोदींच्या वैयक्तिक भेटीचं फडणवींसांनी ‘असं’ केलं स्वागत

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मुद्द्यासाठी आज (८ जून) मुख्यमत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अशोश चव्हाण यांनी दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले या सगळ्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या भेटीआधी मुख्यमंत्री आणि मोदी यांच्यात व्यक्तीगत भेट झाल्याचं सांगितलं जात होतं. याला उद्धव ठाकरे यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान, एकीकडे जेव्हा दिल्लीत ही भेट सुरु होती तेव्हा महाराष्ट्रातील भाजपच्या महत्वाच्या नेत्यांनी एक बैठक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर बोलवली होती. या बैठकीला प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस असं म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दिल्लीत व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागतच आहे. या भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मोदी-ठाकरे भेटीचं स्वागत केलं. मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होत असते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, राजकराणात आम्ही एकमेकांना विरोध करतो पण वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम होत नाही, असं फडणवीसही म्हणाले आहेत. #devendrafadnavis #uddhavthackeray #narendramodi #marathareservation #bjp #shivsena #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशा बेसलेस लोकांवर काय बोलायचं; Kishori Pednekar यांची Rana पती-पत्नीवर टीका

News Desk

#LockdownIndia | तज्ञांच्या मते देशात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक, केंद्राचा निर्णय काय ?

Gauri Tilekar

Raj Thackeray यांचं टार्गेट आता ‘बारामती’

Manasi Devkar