HW News Marathi
राजकारण

AIMIM चे अध्यक्ष ओवेसी यांनी कॉंग्रेसवर केले गंभीर आरोप

मुंबई | AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे नेहमी बीजेपी आणि आरएसएसवर सतत शाब्दिक हल्ला करतात परंतु आता ओवेसींनी आपला मोर्चा कॉंग्रेसकडे वळवला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेंने दिलेल्या वृत्तानुसार ओवेसी म्हणाले, “कॉंग्रेसने निर्मल (तेलंगाना) मध्ये माझी रॅली न काढण्यासाठी मला २५ लाख रुपये दिले. यापेक्षा त्यांचा अहंकाराचा आणखी कोणता पुरावा असू शकतो? ते म्हणाले, ‘ कॉंग्रेस मला जे समजत आहे तसा मी नाही.

उपस्थितांना संबोधत असताना ओवेसी यांनी कॉंग्रेसच्या अनेक दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले. ते राहुल गांधींना लक्ष करत म्हणाले एकीकडे कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करीत आहे. तरीही कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात एका प्रतिष्ठित वकीलाला बाबरी मस्जिद केसच्या सुनावणी दरम्यान केस लढण्यापासून रोकले होते.

महत्त्वाचे म्हणजे, ओवेसी यांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर देखील खोटे आरोप केले होते. ते म्हणाले होते की ,अमित शहा काँग्रेसमुक्त भारत बनविण्यास इच्छुक नाहीत. पण अमित शहा यांना भारत मुस्लिम मुक्त भारत बनवायचा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“सुषमा अंधारे कोण?”, असा सवाल करत प्रताप सरनाईकांची टीका

Aprna

काँग्रेस-राष्ट्रावादीची चर्चा पूर्ण, उद्या मित्रपक्षांनंतर शिवसेनेशी करणार चर्चा

News Desk

तुमचा देखील ‘पानसरे-दाभोळकर’ करु, भूजबळांना धमकी

News Desk
राजकारण

काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते !

News Desk

मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांतील सर्वच नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. मराठा आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये. ‘इतरांना कोणताही त्रास न देता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. या आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते. मराठा समाजाला आरक्षण देत असताना घटना आणि कायद्याच्या नियमांमध्ये बसणारच आरक्षण द्यावे’, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

‘सरकारने विरोधकांच्या म्हणण्याचा विचार करून अंतिम निर्णय घ्यायचा असतो. परंतु हे सरकार विरोधकांचं म्हणणंच ऐकून घेत नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळू शकेल का ? याबद्दल आम्हाला शंका असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते.आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा समाजच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात मोठा गोंधळ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता हा प्रश्न केंद्राकडे सोपवला आहे.

Related posts

माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

मी शिवसेना सोडली कारण….!

News Desk

काँग्रेसने हे मान्य केले की, राहुल गांधी नापास झाले आहेत !

News Desk