HW News Marathi
राजकारण

अक्षय तृतीयेला शिबीर रद्द, आमदार पाटील यांच्या मागणीला यश

मुंबई | महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत सध्या शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे सुरु आहेत. बुधवार १८ एप्रिल २०१८ रोजी अक्षयतृतीया हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला मुहूर्त आल्यामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर त्या दिवशी रद्द करण्यात यावे अशी मागणी शिक्षक आमदार कपील पाटील यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

महाराष्ट्रात अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो. त्या दिवशी अनेक लोक महत्वाची खरेदी तसेच लग्न सोहळे अशा अत्यंत महत्वाच्या शुभ प्रसंगांचे आयोजन करतात. १ मे महाराष्ट्र दिन सुट्टी असून देखील शिक्षकांना शाळेत यावे लागते. अक्षयतृतीयेला विद्यार्थ्यांना सुट्टी असते ही बाब लक्षात घेता बुधवार १८ एप्रिल २०१८ रोजीचे प्रशिक्षण शिबीर रद्द करावे तसेच राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामंधील शिक्षक, शिक्षकेतरांना अक्षय तृतीयेची विषेश रजा मंजूर करावी अशी विनंती आमदार कपील पाटील यांनी पत्राद्वारे शिक्षण संचालकांना केली.

आमदार कपील पाटील यांच्या पत्राची दखल घेत महाराष्ट्र विद्या प्राधिकरण उपसंचालकांनी सध्या सुरु असलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबीराला अक्षय तृतीयेदिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करणार – फडणवीस

Manasi Devkar

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना महाराष्ट्र पोलिसांनाकडून अटक

News Desk

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा

News Desk
देश / विदेश

‘हात’ राहणार की जाणार?

News Desk

नवी दिल्ली | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘पंजा’च्या वैधतेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या १८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह अवैध ठरवावे यासाठी निवडणूक आयोगाकडे याचिका केली होती.

निवडणूकीच्या आचारसंहितेनुसार शरीराचा कोणताही अवयव निवडणूक चिन्ह असू शकत नाही. यासोबतच निवडणूक चिन्ह घेऊन कोणीही मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही असाही नियम आहे. मात्र काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असल्याने या दोन्ही नियमांचे उल्लंघन होते असे सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असलेल्या उपाध्याय यांनी सांगितले. कर्नाटकमधील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू असताना काँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान आहे. आता मात्र काँग्रेसचा ‘पंजा’च संकटात सापडल्याने पक्षासमोरील अडचणी नक्कीच वाढल्या आहेत.

Related posts

#NirbhayaCase : आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली, दोषींना फाशी अटळ

News Desk

मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावर अमित शहा म्हणाले…!

News Desk

“ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू झाला नाही ना?”; मलिकांचा भाजपला सवाल

News Desk