HW News Marathi
राजकारण

मोदी सरकार विरोधात अण्णांचे उपोषण

नवी दिल्ली | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार विरोधात एल्गार पुकारले आहे. येत्या २३ मार्चपासून अण्णा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. दिल्लीतील पंजाबी बाग परिसरातील कार्यलयाचे उदघाटन करुन पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला.

मोदी सराकारने फक्त जनतेला आश्वसनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले आहेत. तर भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करुन प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. तसेच ६० वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन देण्याची मागणी अण्णांनी केली. भ्रष्टाचाराच्या विरोधात आणलेला लोकपाल कायदा कमकुवत आहे. याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईडीने संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज PMLA न्यायालयात करणार हजर

Aprna

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

News Desk

“…किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

Aprna
देश / विदेश

दहशतवादाविरोधी लढाईत अमेरिका भारतासोबत

News Desk

नवी दिल्ली | मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या दशकपुर्तीनिमित्ताने दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत आता अमेरिका देखील सामील झाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत राहण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1067142262545674240

२६/११ च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मुख्य सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या ६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकेकडून या हल्ल्याची शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

 

Related posts

मध्य प्रदेशमधील ‘सस्पेन्स’ कायम आहे इतकेच म्हणता येईल !

swarit

#CoronaVirus : घाबरून युद्ध जिंकता येत नाही, आपण जिद्दीने लढू !

swarit

गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशामध्ये हिंसाचार

News Desk