HW News Marathi
मुंबई

#26/11Attack : अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याची माहिती देणाऱ्याला ३५ कोटींचे बक्षीस

मुंबई | अमेरिकेकडून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांची माहिती देणाऱ्याला ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज(नोव्हेंबर)ला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह पूर्ण राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या हल्ल्याचे मुख्य सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, अमेरिकेकडून या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. या दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये ३४ परदेशी नागरिकांसह १६६ नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मानव कल्याणासाठी साऱ्याविश्वाला बुद्ध हवा -केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

News Desk

…तर मनसेच्या मीनाक्षी डोईफोडे गुडघ्यावर चालणार   

News Desk

मध्यावधी निवडणुका झाल्या तरीही विजय आमचाच – अमित शहा

News Desk
राजकारण

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा विधानभवनावर धडकणार

News Desk

मुंबई | मराठा क्रांती मोर्चा प्रमुख वीस मागण्या घेऊन सोमवारी (२६ नोव्हेंबर) विधानभवनावर पुन्हा एकदा धडकणार आहे. या निर्णायक आंदोलनासाठी मराठा समाज आपल्या वाहनांसह मुंबईत दाखल होत असल्याने राजधानीत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर मराठा समाजाला किती टक्के व कोणत्या प्रवर्गातून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण सरकार देणार, याबाबत मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. त्यासाठी आरक्षणासह प्रमुख वीस मागण्यांसाठी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’ची हाक देण्यात आली आहे.

सोमवारी होणार्‍या आंदोलनासाठी १६ नोव्हेंबरपासून गावोगावी मराठा संवाद यात्रा काढून जनजागृती करण्यात आली असून, या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता लाखो मराठा बांधव सोमवारी मुंबईत धडकतील. तसेच हजारो वाहने मुंबईत दाखल होणार असल्याचा समन्वयकांचा दावा आहे.

 

Related posts

आचरेकरांवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार का केले नाहीत !

News Desk

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aprna

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – एकनाथ शिंदे

Aprna