HW News Marathi
राजकारण

आव्हाडांनी का घेतली उद्धव ठाकरेंची भेट ?

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (१२ ऑक्टोम्बर ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या निवास स्थानी झालेल्या भेटीत नक्की काय चर्चा झाली असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी वारंवार सेना- भाजप पक्षावर टीका केली आहे. तसेच सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या माध्यमातून आव्हाड यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली आहे. उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलाय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

जितेंद्र आव्हाड पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरे व आव्हाड यांच्यात तासभर चर्चा रंगली होती. ट्विटर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सदिच्छा भेट घेतल्याचे जाहीर केले आहे. आव्हाड हे उद्धव ठाकरेंना पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते असे बोलले जात आहे. १८ ऑक्टोबर रोजी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रमामध्ये अनेक नेते मंडळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. म्हणून या कार्यक्रमासाठी मातोश्रीवर जाऊन भेट दिल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या आव्हाड आणि ठाकरे यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगलेली पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

News Desk

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna