HW News Marathi
राजकारण

मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्यानंतर करा !

मुंबई । सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्तारावर वाढविण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळात कोण कोणत्या मंत्र्यांची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे. या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांच्या नावाची यादी मध्ये पाठविण्यात आली आहे. तर परंतु आरपीआय पक्षातून अविनाश महातेकर नाव पुढे येत आहे.

तर शिवसेनेकडून कोणतीही यादी तयार करण्यात आलेली नाही. परंतु त्यात कोणाची निवड करायची हा पेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्यानंतर करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एक किंवा दोन जणांच्या नावाचा समावेश होणार आहे.

शिवसेनेमध्ये नाराजीचा सुर

शिवसेनेच्या काही विद्यमान मंत्र्यांविरोधात शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुका जिंकणार्‍या आमदारांना मंत्रीपद देण्याऐवजी विधानपरिषदेवर असलेल्या नेत्यांना कॅबीनेट मंत्रीपदे देण्यात आल्याने शिवसेनेत खदखद आहे. या मंत्र्यांच्या कामाविषयी आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजीही बोलून दाखविली आहे. मात्र, शिवसेनेच्या या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदावरुन हटविणे कठीण आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदींनी राफेल, नोटबंदीसह नीरव मोदींवर माझ्याशी खुली चर्चा करावी !

News Desk

हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा! – उद्धव ठाकरे

Aprna

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

News Desk
राजकारण

भाजपला चढलेली सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी | सुप्रिया सुळे

Gauri Tilekar

जळगाव | राज्यात महिला व कामगारांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सत्ताधारी मंत्री व लोकप्रतिनिधी असंवेदनशील विधाने करीत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे, ती मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी असल्याचे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केले. सुप्रिया सुळे तीन दिवसांच्या दौऱ्यावर जळगावाला गेल्या होत्या, गुरुवारी दुपारी त्यांनी जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषदेत हजेरी लावली. या वेळी खासदार सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजपचे केवळ निवडणूक जिंकणे हेच लक्ष्य आहे असा टोमणा पत्रकार परिषदेत सुप्रियाने मुख्यमंत्रींना मारला. मुख्यमंत्र्यांच्या दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करू या विधानावर,तीन आठवडे का वाट पाहतात. आत्ताच दुष्काळ का जाहीर करीत नाहीत, असा सवाल खासदार सुळे यांनी उपस्थित केला. असा टोलाही खासदार सुळे यांनी लगावला.

देशाचा इतिहास गिरीश महाजन यांनी वाचलेला नाही

महात्मा गांधी हे भाजपच्या विचारांचे होते, या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यवर देशाचा इतिहास गिरीश महाजन यांनी वाचलेला दिसत नाही, त्यामुळे असे वक्तव्य करीत आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, तिलोत्तमा पाटील, कल्पना पाटील, मंगला पाटील, मीनल पाटील, कल्पिता पाटील, राजेश पाटील आदी उपस्थित होते. जळगाव लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉ. राजेश पाटील यांचा गुरुवारी सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

बहिणाबाईंचे स्मारक अजून अपूर्णच कसे ?

जळगाव दौऱ्यावर असताना खाजदार सुळे यांनी असोद्याला बांधत असलेल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाची पाहणी केली. स्मारकाचे बांधकाम अजून पूर्ण न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि भाजपावर संताप व्यक्त केला आहे. आघाडी सरकारने बहिणाबाईंचे स्मारक मंजूर करून पहिल्या टप्प्याचा निधी तत्काळ दिला असून बांधकाम अजून अपूर्णच कसे ? असा प्रश्न सुळे यांनी केला.भाजप सरकारने या स्मारकाचे काम जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवण्याचे पाप केल्याचा आरोपदेखील खासदार सुळे यांनी केला.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

News Desk

राजस्थानमध्ये १०५ वर्षीय महिलेने बजावला मतदानाचा हक्क

News Desk

कर्नाटकातील मंत्रिमंडळाचा विस्तार, १७ मंत्र्यांनी घेतली शपथ

News Desk