HW News Marathi
राजकारण

भीमा-कोरेगाव येथे ३० डिसेंबरला आझाद यांची जाहीर सभा

नवी दिल्ली | भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी चंद्रशेखर आझाद हे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार जाहीर सभा घेणार आहेत. भीमा-कोरेगाव येथे ३० डिसेंबरला आझाद यांची जाहीर सभा होणार असून या सभेत आझाद नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या वर्षी झालेल्या भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावेळी पुन्हा तशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ नये, असे मत व्यक्त केले जात आहे.

भीमा-कोरेगाव हे आमचे तीर्थस्थळ असून सभेसाठी जे स्थळ निश्चित करण्यात आले आहे तेथेच जाहीर सभा होणार असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील वातावरण खराब होऊ नये ही जबाबदारी सरकारची आहे, असे चंद्रशेखर आझाद यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी ‘भीम आर्मी’च्या सभेला परवानगी नाकारली होती. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या सभेसाठी भीम आर्मीने वरळीतील जांबोरी मैदानात त्याचप्रमाणे दादरच्या चैत्यभूमी परिसरात सभेच्या आयोजनाची परवानगी मागितली होती. परंतु, मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली आहे.

“भीम आर्मीने शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंच्या मुंबईतील कार्यक्रमाला विरोध केल्याने जाणूनबुजून पोलीस आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली”, असे भीम आर्मीने म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘भाजपला लोकांनी त्यांची जागा दाखवली’, जयंत पाटलांचं टीकास्त्र

Manasi Devkar

राज्यातील सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार !

News Desk

बाळासाहेबांचे विचार आपल्याला कायम मार्गदर्शन करतील !

News Desk
राजकारण

काँग्रेस पक्षाचा १३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

News Desk

नवी दिल्ली | देशात वर्चस्व गाजविणार काँग्रेस पक्षाचा आज(२८ डिसेंबर) १३४ वा वर्धापन दिन साजरा केला आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यालयात झेंडा फडकाविला आहे. या दरम्यान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगसह पक्षातील दिग्गज नेत्यांनी उपस्थित होते. पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मनमोहन सिंग आणि राहुल गांधी या दोघांनी केक कापून आनंद साजरा केला आहे. नुकत्याच तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पराभूत केले आहे.

दादाभाई नौराजी, एओ ह्यूम आणि दिनशा वाचा यासारख्या दिग्गज नेत्यांनी १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना केली होती. या काळी भारतावर ब्रिटिशांचे वर्स्वच होते. १९४७मध्ये भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर काँग्रेस ही देशातील सर्वा मोठा पक्ष बनली होती. देशाला स्वतंत्र १९४७ मिळाल्यापासून ते २०१६ पर्यंत झालेल्या एकूण १६ निवडणुकीत काँग्रेसने ६ वेळा बहुमत मिळविले आहे. याव्यतिरिक्त ४ वेळा काँग्रेस युक्त सरकार स्थापन केली आहे. देशातील पहिल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूपासून ते मनमोहन सिंग असे एकू ७ वेळा काँग्रेसचे पंतप्रधान राहिले आहेत. परंतु २०१४च्या निवडणुकीत काँग्रेससाठी सर्वात मोठी हार मानली जाते. यावेळी काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.

 

Related posts

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

Manasi Devkar

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी

Aprna

मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोग | सचिन सावंत

News Desk