HW News Marathi
राजकारण

आता तपासामध्ये एकेक मासा अडकत चालला आहे !

मुंबई | “मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शरद पवार यांच्यावरील ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईही भाजपचा कोणत्याही पद्धतीने संबंध नाही. “आता तपासामध्ये एकेक मासा अडकत चालला आहे. यात कोण अडकतो ? यापेक्षा का अडकतो ? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे”, असा टोला देखील रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्या साखर कारखानदारांनी पैसे बुडवले त्यांनीच ते विकत घेतले. अशा पैसे बुडवणाऱ्या कारखानदारांनाच बॅंकेकडून कर्ज देण्यात आले. जसजशी चौकशी होत गेली तसतसे लोक अडकत गेले. यात गुन्हा कोणावर दाखल झाला ? यापेक्षा गुन्हा का दाखल झाला ? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळापासून या प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. शरद पवार यांच्यावर झालेली कारवाई ही कोणत्याही सूडबुद्धीने झालेली नाही”, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुज वाजले; 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार

Aprna

भाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली शंका

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस आता गुजरातमधून २६ जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार

News Desk