HW News Marathi
राजकारण

भाजप उमेदवारांची आज होणार घोषणा

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली आहे . या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दिल्लीतल्या भाजपाच्या कार्यालयात आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आहे . त्यामुळे भाजपा आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार हे सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे. बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात होणा-या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली आहे.

भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जवळपास मध्य प्रदेशातील ४० विधानसभा आमदारांना घरी बसवले जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच भाजपा जवळपास बारापेक्षा अधिक खासदारांना या विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन्ही राज्यात २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात, तर तेलंगला आणि राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राहुल गांधी भाजप नेत्यांपेक्षाही जास्त वेळा मोदींचे नाव घेतात !

News Desk

बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील यांना ‘नो एंट्री’; नेमके काय आहे प्रकरण ?

Aprna

अमित शहांना स्वाईन फ्लू, उपचार सुरू

swarit
देश / विदेश

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी ?

News Desk

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांच्या निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी आणली जावी’ अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास संमती दिली आहे. अश्विनी उपाध्यायाय यांनी ही याचिका केली आहे. दरम्यान, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर असून याचिकाकर्त्यांनी आपल्या या मागणीवरून मागे फिरू नये, असा सल्लाही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर ४ डिसेंबरला सुनावणी करणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा झाल्यास त्यांची नोकरी कायमची गमवावी लागते मग राजकारण्यांना हा नियम लागू का नाही ? असा प्रश्नही ही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. जर कोणत्या व्यक्तीला २ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर ती व्यक्ती शिक्षा भोगल्यानंतर पुढची ६ वर्षे निवडणूक लढवू शकत नाही, असे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम-८ (३) मध्ये सांगितले गेले आहे. मात्र या याचिकेमध्ये यावर आक्षेप घेण्यात आला आहे. म्हणूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यावर आजीवन बंदी आणली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांविरोधात खटल्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सत्र न्यायालय असावे. तसेच मॅजिस्ट्रेट न्यायालयाला अशा प्रकारच्या प्रकरणांची सुनावणी करण्याचे अधिकार मिळायला हवेत, असे यावेळी न्यायालयीन सल्लागारांनी सुचविले आहे.

Related posts

‘CM नाही PM बदला’, काँग्रेस कडून भाजपवर बोचरी टीका!

News Desk

आसाराम बापूला ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

News Desk

‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे !

News Desk