HW News Marathi
राजकारण

भाजप उमेदवारांची आज होणार घोषणा

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली आहे . या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दिल्लीतल्या भाजपाच्या कार्यालयात आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आहे . त्यामुळे भाजपा आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार हे सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे. बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात होणा-या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली आहे.

भाजपने राजस्थानात किमान ८० ते १०० नव्या उमेदवारांना संधी देण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जवळपास मध्य प्रदेशातील ४० विधानसभा आमदारांना घरी बसवले जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच भाजपा जवळपास बारापेक्षा अधिक खासदारांना या विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन्ही राज्यात २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात, तर तेलंगला आणि राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले | ठाकरे

News Desk

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

Aprna
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना बजावली नोटीस

News Desk

नवी दिल्ली | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने नोटीस बजावली आहे. अॅड. सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी(१२ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.

या नोटीसमध्ये स्वतःची बाजू स्पष्ट करावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा दिला होता. फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्हे लपविले होते. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रतिनिधित्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी. यासाठी नागपुरातील अ‍ॅड. सतीश उके यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

७ सप्टेंबर २०१५ रोजी या न्यायालयाने उके यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे उके यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. ३० मे २०१६ रोजी तत्कालीन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडिवाला यांनी उके यांचा अर्ज मंजूर करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तसेच जेएमएफसी न्यायालयाला या प्रकरणावर नव्याने निर्णय देण्याचा आदेश दिला. सत्र न्यायालयाच्या त्या निर्णयाविरुद्ध फडणवीस यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता फडणवीस यांचा अर्ज मंजूर केला. तसेच सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला.

Related posts

“शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावे लागले नाही,” संजय राऊतांचा टोला

Aprna

पुण्यात होणारी पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी; राज ठाकरेंचं फेसबुक पोस्टद्वारे आवाहन

Aprna

कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी !

News Desk