HW News Marathi
राजकारण

कोकण दौरा रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना

मुंबई | राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. तर मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत सुरु असलेला संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. दरम्यान, राज्यातील या संपूर्ण सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भूमिकेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. “आपण जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू. आपण विरोधी पक्षातच बसू”, असे जरी राष्ट्रवादी-काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आले असले तरीही राज्याच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष आता महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यातच, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपला कोकण दौरा रद्द करून उद्या (८ नोव्हेंबर) मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे, ते काय बोलणार ? पुढची भूमिका काय असणार ?याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शरद पवार हे आज (६ नोव्हेंबर) कराडच्या आपल्या नियोजित दौऱ्यावर होते. त्यानंतर, कराडमधील कार्यक्रम संपवून शरद पवार हे कोकणच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, आता राज्यातील सत्तासंघर्ष पाहता शरद पवार यांनी आपला कोकण दौरा रद्द केला असून ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे, उद्या मुंबईत आल्यानंतर शरद पवार राज्यातील या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. खरंतर बुधवारीच (६ नोव्हेंबर) शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. “राज्यातील जनतेने दिलेल्या कौलानुसार भाजप-शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन करावे. सध्या महाराष्ट्र अडचणीत आहे. लवकर निर्णय घ्यावा. आम्ही विरोधी पक्षातच बसणार”, असे म्हणत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, भाजप-शिवसेना कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचत नसताना आपला कोकण दौरा रद्द करून उद्या मुंबईत दाखल होण्यामागे नेमके त्यांचे कारण काय ?याबाबत सध्या चर्चा रंगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BharatBandh | भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

News Desk

“कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…,” राऊतांचा बंडखोरांना इशारा

Aprna

“एकनाथ शिंदे शिवसेनेचे नाही ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात”, जयंत पाटलांचा टोला

Aprna